शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

आम्हाला पाणी पाहिजे; गांधीग्रामच्या महिलांचा आक्रोश!

By संतोष येलकर | Updated: April 24, 2023 18:21 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो.

अकोला : खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गेल्या महिनाभरापासून गावाला पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे ‘आम्हाला पाणी पाहीजे ’ असा आक्रोश करीत, गांधीग्राम येथील महिलांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीइओ) कार्यालयात हंडा मोर्चा काढला. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र पाणीपुरवठा योजनेचे ट्रान्सफार्मर जळाल्याने आणि जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात लिकेजेस असल्याने, गेल्या एक महिन्यापासून ( २५ मार्च) गावाला अद्याप पाणीपुरवठा करण्यात आला नाही. 

महिनाभरापासून नळ योजनेचे पाणी मिळाले नसल्याने, ग्रामस्थांना पूर्णा नदीतील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तसेच जनावरांनाही पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे गावाला तातडीने पाणीपुरवठा सुरु करुन, किमान आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा आणि पूर्णा नदीचे पाणी दूषित होवू नये, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी करीत २४ एप्रिल रोजी गांधीग्राम येथील महिलांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. डोक्यावर रिकामे हंडा घेवून आलेल्या महिलांनी ‘आम्हाला पाणी पाहीज’ अशा घोषणा देत गावात तातडीने पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली. या मोर्चात गांधीग्राम येथील सरपंच सुषमा ठाकरे यांच्यासह कुसुम पाटील, कल्पना निचळे, सुलोचना गावंडे, शोभा अढाऊ, सुवर्णा फुरसुले, सुमन इंगळे, अनिता हिंगणकर, सुवर्णा गावंडे, छाया मोहिते, दिपाली अढाऊ, पुष्पा अढाऊ, लता धुरेराव, मालू सदांशिव, प्रतिभा इंगळे, शरद ठाकरे, नरेंद्र सदांशिव, सदानंद ढोकणे, महादेव गवइ, गजानन अढाऊ आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

 मंगळवारी मिळणार गावाला पाणी; ‘सीइओं’चे आश्वासनगांधीग्राम येथील सरपंच सुषमा ठाकरे यांच्या नेतृत्वात महिलांच्या शिष्टमंडळाने गावातील पाणी प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याशी चर्चा केली. महिनाभरापासून बंद असलेला गावातील पाणीपुरवठा तातडीने सुरु करुन, आठवड्यातून किमान आठ दिवसाआड पाणी देण्याची मागणी केली. त्यानुषंगाने मंगळवार,२५ एप्रिल रोजी गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पंधरा दिवसाआड गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी महिलांच्या शिष्टमंडळास दिले. 

टॅग्स :Akolaअकोला