शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला पाणी पाहिजे; गांधीग्रामच्या महिलांचा आक्रोश!

By संतोष येलकर | Updated: April 24, 2023 18:21 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो.

अकोला : खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गेल्या महिनाभरापासून गावाला पिण्याचे पाणी मिळाले नाही. त्यामुळे ‘आम्हाला पाणी पाहीजे ’ असा आक्रोश करीत, गांधीग्राम येथील महिलांनी सोमवारी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीइओ) कार्यालयात हंडा मोर्चा काढला. खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अंतर्गत गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येतो; मात्र पाणीपुरवठा योजनेचे ट्रान्सफार्मर जळाल्याने आणि जलवाहिनीवर मोठ्या प्रमाणात लिकेजेस असल्याने, गेल्या एक महिन्यापासून ( २५ मार्च) गावाला अद्याप पाणीपुरवठा करण्यात आला नाही. 

महिनाभरापासून नळ योजनेचे पाणी मिळाले नसल्याने, ग्रामस्थांना पूर्णा नदीतील दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. तसेच जनावरांनाही पिण्याचे पाणी नाही. त्यामुळे गावाला तातडीने पाणीपुरवठा सुरु करुन, किमान आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा आणि पूर्णा नदीचे पाणी दूषित होवू नये, यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी करीत २४ एप्रिल रोजी गांधीग्राम येथील महिलांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात हंडा मोर्चा काढला. डोक्यावर रिकामे हंडा घेवून आलेल्या महिलांनी ‘आम्हाला पाणी पाहीज’ अशा घोषणा देत गावात तातडीने पाणीपुरवठा सुरु करण्याची मागणी केली. या मोर्चात गांधीग्राम येथील सरपंच सुषमा ठाकरे यांच्यासह कुसुम पाटील, कल्पना निचळे, सुलोचना गावंडे, शोभा अढाऊ, सुवर्णा फुरसुले, सुमन इंगळे, अनिता हिंगणकर, सुवर्णा गावंडे, छाया मोहिते, दिपाली अढाऊ, पुष्पा अढाऊ, लता धुरेराव, मालू सदांशिव, प्रतिभा इंगळे, शरद ठाकरे, नरेंद्र सदांशिव, सदानंद ढोकणे, महादेव गवइ, गजानन अढाऊ आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.

 मंगळवारी मिळणार गावाला पाणी; ‘सीइओं’चे आश्वासनगांधीग्राम येथील सरपंच सुषमा ठाकरे यांच्या नेतृत्वात महिलांच्या शिष्टमंडळाने गावातील पाणी प्रश्नावर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांच्याशी चर्चा केली. महिनाभरापासून बंद असलेला गावातील पाणीपुरवठा तातडीने सुरु करुन, आठवड्यातून किमान आठ दिवसाआड पाणी देण्याची मागणी केली. त्यानुषंगाने मंगळवार,२५ एप्रिल रोजी गांधीग्राम येथे पाणीपुरवठा करण्यात येणार असून, पंधरा दिवसाआड गावाला पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ) सौरभ कटियार यांनी महिलांच्या शिष्टमंडळास दिले. 

टॅग्स :Akolaअकोला