शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

‘गोंधळ’ संपण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: October 14, 2014 01:26 IST

पुरातन कला जपण्यासाठी नवी पिढी अनुत्सुक; गोंधळी समाजाच्या पुनरुज्जीवनाची गरज.

राम देशपांडे /अकोला

        मंगल कार्याप्रसंगी विविध देवी-देवतांचा गोंधळ घालण्याची परंपरा संपूर्ण राज्यात विखुरलेल्या गोंधळी समाजाने जपली आहे. काळाच्या ओघात ही प्रथा सुरू ठेवण्याविषयी नवीन पिढी फारशी उत्सुक नाही. परिणामी, ही कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणार्‍या या समाजातील ज्येष्ठांना पोटापाण्यासाठी इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. हीच परिस्थिती राहिली तर, भविष्यात ही कला लोप पावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. शूभकार्याप्रसंगी देवीची स्तुती व पूजा करून गोंधळ घालण्याची प्रथा जुन्या काळी उदयास आली. पुराणादी लेखांमध्येही या कलेचा उल्लेख आढळतो. गनिमी काव्याचा एक भाग म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी गोंधळी समाजाने विकसित केलेल्या ह्यकरपल्लवीह्ण या सांकेतिक भाषेचा वापर केला होता. असुरी शक्तींवर विजय मिळविण्यासाठी गोंधळ घालून दैवी शक्तीला जागृत करणारे गोंधळीबुवा सर्वज्ञात आहेत. संबळ, तुणतुणं, टाळ, डफ अशी सर्व वाद्ये घेऊन तीन-चार गोंधळींचा समूह गोंधळ घालण्यासाठी घरोघरी जातात. खंडोबा, जोतिबा, काळू आई, रेणुका अशा विविध देवी-देवतांचा जागर गोंधळींद्वारे घातला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा गोंधळी समाजाने जपली असली तरी, सध्याच्या घडीला गोंधळी समाज अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. गोंधळाच्या माध्यमातून एकेकाळी संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या या समाजातील ज्येष्ठांना सद्यस्थितीत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून, नाइलाजाने इतर लहान- मोठय़ा व्यवसायांचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने गोंधळी समाजाला भटक्या विमुक्त जमातीमध्ये समाविष्ट केले असले तरी, शासनाच्या कित्येक योजना या समाजापर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत. तद्वतच, या कलेतून फारसे उत्पन्नही मिळत नसल्याने, या समाजाची नवीन पिढी वडिलोपार्जित परंपरा पुढे चालवावयास तयार नाहीत. शासनाने ज्येष्ठ कलाकारांसाठी सुरू केलेल्या अनुदान योजनेपासून या समाजातील हजारो ज्येष्ठ नागरिक अद्याप वंचित आहेत. केवळ आश्‍वासनांचे तुणतुणे वाजविणार्‍या अधिकार्‍यांना वारंवार अर्ज, निवेदने देऊन झाली; मात्र काहीही उपयोग झाला नाही. या समाजाला मदतीच्या हाताची गरज आहे. केवळ नोकरी आणि व्यवसायामागे धावणार्‍या नवीन पिढीमुळे भविष्यात ह्यगोंधळह्ण कला लोप पावण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत गोंधळी समाजाचे अध्यक्ष राजू पेंढारी यांनी व्यक्त केले.