शहरं
Join us  
Trending Stories
1
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
2
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
3
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
4
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
5
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
6
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
7
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
8
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
9
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
10
Nashik Crime: टोळी संघर्षातून गोळीबार, भाजप नेत्यानंतर म्होरक्या विकी वाघसह साथीदार अडकला जाळ्यात
11
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
12
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
13
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
14
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
15
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यात 'गुगल' दाखवणार गर्दीतून वाट; अडीच हजार CCTV ची शहरावर नजर
16
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
17
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
18
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
19
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
20
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण

‘गोंधळ’ संपण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: October 14, 2014 01:26 IST

पुरातन कला जपण्यासाठी नवी पिढी अनुत्सुक; गोंधळी समाजाच्या पुनरुज्जीवनाची गरज.

राम देशपांडे /अकोला

        मंगल कार्याप्रसंगी विविध देवी-देवतांचा गोंधळ घालण्याची परंपरा संपूर्ण राज्यात विखुरलेल्या गोंधळी समाजाने जपली आहे. काळाच्या ओघात ही प्रथा सुरू ठेवण्याविषयी नवीन पिढी फारशी उत्सुक नाही. परिणामी, ही कला जिवंत ठेवण्यासाठी आयुष्य खर्ची घालणार्‍या या समाजातील ज्येष्ठांना पोटापाण्यासाठी इतर व्यवसायांकडे वळावे लागत आहे. हीच परिस्थिती राहिली तर, भविष्यात ही कला लोप पावते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे. शूभकार्याप्रसंगी देवीची स्तुती व पूजा करून गोंधळ घालण्याची प्रथा जुन्या काळी उदयास आली. पुराणादी लेखांमध्येही या कलेचा उल्लेख आढळतो. गनिमी काव्याचा एक भाग म्हणून, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळय़ांनी गोंधळी समाजाने विकसित केलेल्या ह्यकरपल्लवीह्ण या सांकेतिक भाषेचा वापर केला होता. असुरी शक्तींवर विजय मिळविण्यासाठी गोंधळ घालून दैवी शक्तीला जागृत करणारे गोंधळीबुवा सर्वज्ञात आहेत. संबळ, तुणतुणं, टाळ, डफ अशी सर्व वाद्ये घेऊन तीन-चार गोंधळींचा समूह गोंधळ घालण्यासाठी घरोघरी जातात. खंडोबा, जोतिबा, काळू आई, रेणुका अशा विविध देवी-देवतांचा जागर गोंधळींद्वारे घातला जातो. पूर्वापार चालत आलेली ही परंपरा गोंधळी समाजाने जपली असली तरी, सध्याच्या घडीला गोंधळी समाज अत्यंत नाजूक परिस्थितीतून जात आहे. गोंधळाच्या माध्यमातून एकेकाळी संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या या समाजातील ज्येष्ठांना सद्यस्थितीत बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असून, नाइलाजाने इतर लहान- मोठय़ा व्यवसायांचा आधार घ्यावा लागत आहे. शासनाने गोंधळी समाजाला भटक्या विमुक्त जमातीमध्ये समाविष्ट केले असले तरी, शासनाच्या कित्येक योजना या समाजापर्यंत अद्याप पोहोचलेल्या नाहीत. तद्वतच, या कलेतून फारसे उत्पन्नही मिळत नसल्याने, या समाजाची नवीन पिढी वडिलोपार्जित परंपरा पुढे चालवावयास तयार नाहीत. शासनाने ज्येष्ठ कलाकारांसाठी सुरू केलेल्या अनुदान योजनेपासून या समाजातील हजारो ज्येष्ठ नागरिक अद्याप वंचित आहेत. केवळ आश्‍वासनांचे तुणतुणे वाजविणार्‍या अधिकार्‍यांना वारंवार अर्ज, निवेदने देऊन झाली; मात्र काहीही उपयोग झाला नाही. या समाजाला मदतीच्या हाताची गरज आहे. केवळ नोकरी आणि व्यवसायामागे धावणार्‍या नवीन पिढीमुळे भविष्यात ह्यगोंधळह्ण कला लोप पावण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे मत गोंधळी समाजाचे अध्यक्ष राजू पेंढारी यांनी व्यक्त केले.