शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

ग्रामस्थांच्या माथी तेलकट पाणी!

By admin | Updated: May 23, 2016 01:51 IST

पाणीपुरवठय़ासाठी तेल वाहतूक करणारे टँकर, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात.

संतोष येलकर /अकोलाखारपाणपट्टय़ातील अकोला तालुक्यात खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ पैकी ३५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे; मात्र पाणीपुरवठा करणारे काही टँकर तेल वाहतूक करणारे असल्यामुळे तहानलेल्या ग्रामस्थांना तेलकट पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.अकोला शहरासह खारपाणपट्टय़ातील अकोला तालुक्यातील ६४ गावांना खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने, यावर्षी काटेपूर्णा धरणातील जलसाठा केवळ अकोला शहरासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून गत नोव्हेंबरपासून सुकळी येथील तलावातून ६४ गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला; मात्र सुकळीचा तलाव आटल्याने या तलावातून ६४ गावांना होणारा पाणीपुरवठा १३ मे पासून बंद झाला आहे. त्यामुळे खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ५५ गावांना २६ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. मात्र, सोयाबीन व सरकीचे तेल वाहून नेणार्‍या टँकरद्वारे हा पाणीपुरवठा होत असल्याचे आढळून आले आहे. पाण्यावर तेलाचे तवंग आणि दुर्गंधी येत असल्याने, काही गावांमध्ये टँकरच्या पाण्याचा उपयोग पिण्याऐवजी वापरासाठी करण्यात येत आहे; मात्र पिण्यायोग्य पाणी स्रोत उपलब्ध नसलेल्या बहुतांश गावांमधील ग्रामस्थांना टँकरद्वारे मिळणार्‍या तेल तवंगाच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.