शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
2
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
3
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
4
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
5
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
6
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
7
पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
8
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
9
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
10
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
11
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
12
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
13
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
14
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
15
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
16
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
17
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
18
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
19
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
20
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य

जलकुंभीमुळे नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 14:59 IST

डासांची पैदास वाढली असून, नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे.

अकोला: मोर्णा नदी स्वच्छता अभियानचा गाजावाजा करीत नदीपात्रातील जलकुंभी काढण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यात आला होता. मोर्णा नदीची थातूरमातूर पद्धतीने स्वच्छता केल्यामुळे मोर्णेच्या पात्रात पुन्हा एकदा जलकुंभी बहरल्याचे चित्र आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपा प्रशासनाने २० लाखांची तरतूद केली असली तरी प्रत्यक्षात जलकुंभी काढण्याच्या कामाला कधी सुरुवात होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेने दिलेल्या निवेदनाचा प्रशासनाला विसर पडल्याचे समोर आले आहे.कधीकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणाºया मोर्णा नदीची महापालिकेच्या अनास्थेमुळे पुरती वाट लागली आहे. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी पर्यायी उपाययोजना न करता प्रशासनाने मोर्णा नदीपात्राचा वापर केल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोर्णा नदीच्या पात्रात वर्षभर घाण सांडपाणी तुंबल्याचे दिसून येते. त्यावर निर्माण होणारी जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाकडून दरवर्षी ८ ते १० लाख रुपये खर्च केले जातात. गतवर्षी जिल्हा प्रशासनाने स्वच्छ भारत अभियानाच्या सबबीखाली मोर्णा नदी स्वच्छता अभियान राबविले होते. यामध्ये मनपा प्रशासनासह सत्ताधारी भाजपच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी हिरिरीने सहभाग नोंदविला. या कामासाठी नदीपात्रात मनपाच्या मोटर वाहन विभागाची अख्खी यंत्रणा जुंपण्यात आली होती. मोर्णा स्वच्छता अभियानाला एक वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरीही नदीपात्रातील घाण सांडपाण्याची व जलकुंभीची समस्या कायमच असल्याचे दिसत आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलकुंभी निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. डासांचा उच्छाद वाढला असून, स्थानिक रहिवाशांना विविध आजारांनी त्रस्त करून सोडले आहे.शिवसेनेच्या निवेदनाला केराची टोपलीजलकुंभीमुळे नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी नदीकाठच्या प्रभागांमध्ये दैनंदिन धुरळणी व फवारणी करण्याची मागणी शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सेनेच्या सर्व नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली होती. सेनेच्या निवेदनाला प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष का?नदीपात्रातील जलकुंभी व सांडपाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, याकडे महापौर विजय अग्रवाल व आयुक्त संजय कापडणीस यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. या समस्येचा महापौरांसह आयुक्त निपटारा का करीत नाहीत, असा सवाल अकोलेकर उपस्थित करीत आहेत.

 

टॅग्स :Morna Riverमोरणा नदीAkolaअकोला