शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

हिंगणा तानखेड येथून होणार पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 01:37 IST

मूर्तिजापूर : महान धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तिजापूर शहराला हिंगणा तानखेड व शिवण लघू धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतली मूर्तिजापूर शहराच्या पाणीपुरवठय़ावर बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : महान धरणातून पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. या संकटावर मात करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत मूर्तिजापूर शहराला हिंगणा तानखेड व शिवण लघू धरणातून पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. निम्मा पावसाळा निघून गेला असला, तरी मूर्तिजापूर शहर व तालुक्यात दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे धरणांनी तळ गाठला असून, मूर्तिजापूर ग्रामीण व शहरी भागात जल संकट निर्माण झाले आहे. महान धरणात पाणी नसल्याने शहराचा पाणीपुरवठा खंडीत झाला आहे. हिंगणा बंधारा येथून सध्या शहराकरिता पाणी येत आहे. परंतु, तेथेही जास्त पाणी साठा नसल्याने पाऊस न आल्यास भीषण पाणी समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.नैसर्गिक बिकट स्थितीचा संपूर्ण आढावा घेऊन शक्य त्या उपाययोजना करण्यासंदर्भात पालकमंत्री  डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय  यांच्या कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत आमदार हरीश पिंपळे, आ. गोपीकिसन बाजोरिया, मुख्य कार्यकारी अधिकारी रामामूर्ती, जिल्हा पोलीस अधीक्षक कलासागर, वीज वितरणचे मुख्य अभियंता अकोला दोडके, उंबरकर, मूर्तिजापूर नगराध्यक्ष  मोनाली  गावंडे व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान मूर्तिजापूर शहरासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तिजापूर शहरात पाणीटंचाई निर्माण होत आहे. यावर शहरासाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजना मंजूर करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे.