शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

७३५ गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचे होणार पुनरुज्जीवन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 10:58 IST

Akola News ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांना शासनामार्फत १८ जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आली.

- संतोष येलकर

अकोला : ‘जल जीवन मिशन’अंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन आणि पाणीपुरवठा योजना नसलेल्या ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांना शासनामार्फत १८ जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आली.

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रतिदिवस दरडोइ ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकडे सादर करण्यात आला होता. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांतर्गत दरडोइ ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा होत नसलेल्या ७३५ गावांत प्रतिदिवस दरडोई ५५ लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, तसेच पाणीपुरवठा योजना नसलेल्या जिल्ह्यातील ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यास शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजुरी दिली. यासंदर्भात शासनामार्फत १८ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आलेले पत्र जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाले. त्यानुसार जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असून, ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे करण्यात येणार आहेत.

 

नळ जोडण्यांच्या कामांसाठी ७७.८९ कोटी रुपये मंजूर!

जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील ७३५ गावांमध्ये १ लाख २० हजार २१८ नळ जोडण्या देण्याच्या कामांसाठी ७७ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील ७३५ गावांमध्ये नळ जोडणी नसलेल्या कुटुंबांना नळ जोडणी देण्याची कामे करण्यात येणार आहेत.

 

योजनांच्या कामांची सादर करावी लागणार अंदाजपत्रके!

जल जीवन मिशनअंतर्गत शासनामार्फत जिल्ह्यातील ७३५ गावांसाठी जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन, तसेच ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने जुन्या पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन व नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला शासनाच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे सादर करावी लागणार आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक