शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
3
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
4
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
5
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
6
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
7
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
8
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
9
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
10
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
11
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
12
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
13
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
14
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
15
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
16
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
17
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
18
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
19
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
20
Beed: प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव

लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना 'सलाईन'वर; पावसाळ्यातही ४१ गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 14:39 IST

-  संजय उमकमूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे.       देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. यामध्ये  मूर्तिजापूर तालुक्यातील २१ ...

ठळक मुद्दे देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे.

-  संजय उमकमूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे.       देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. यामध्ये  मूर्तिजापूर तालुक्यातील २१ गावांचा तर कारंजा तालुक्यातील ३ गावांचा अशा २४ गावांचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी बंद केला आहे. त्याच प्रमाणे देयके स्थगित असल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील १६ आणि कारंजा तालुक्यातील एका गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे. एकंदरीत ४१ गावांमध्ये जीवन प्राधिकरण विभागानेच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या ५७ गावांपैकी १६ गावांनाच पाणी पुरवठा करण्यात येत असून तोही अनियमित असल्याने सदरची योजना भविष्यात कधीही बंद होऊ शकते.   सदर्हू योजनेवर असलेले गावांचे थकबाकीचे कारण दाखवून अख्ख्या गावचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला; पंरतु पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे.जलकुंभांची स्वच्छता नाहीसध्याच्या स्थितीत या योजने मार्फत १६ गावांना अनियमित गढूळ पाणी पुरवठा होत आहे. प्रत्येक गावातील जलकुंभात (पाण्याची टाकी) प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने व पक्षी मरुन पडल्याने गढूळ व मांसाचे तुकडे असलेला पाणी पुरवठा होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

लाखो रुपये देयका पोटी स्थगित असल्याने १७ गावांचा पाणी पुरवठा तात्पुरता तर २४ कायमस्वरूपी बंद केला आहे. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, पण पाहीजे तसे सहकार्य होत नसल्याने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद करावा लागला.  तात्पुरता पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील लोकांनी देयके भरली तर पाणी पुरवठा पुर्ववत होऊ शकतो.- एम. आर. बोबडे,उपविभागीय अभियंता जीवन प्राधिकरण, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर