शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

लंघापुर ५७ खेडी पाणी पुरवठा योजना 'सलाईन'वर; पावसाळ्यातही ४१ गावे तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 14:39 IST

-  संजय उमकमूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे.       देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. यामध्ये  मूर्तिजापूर तालुक्यातील २१ ...

ठळक मुद्दे देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे.

-  संजय उमकमूर्तिजापूर: तालुक्यातील लंघापुर ५७ गावे पाणी पुरवठा योजना योजने अंतर्गत मूर्तिजापूरसह कारंजा तालुक्यातील ५७ गावे अवलंबून आहेत; परंतु जीवन प्राधिकरणाच्या धोरणामुळेच मोठी पाणी टंचाई दोन्ही तालुक्यात निर्माण झाली आहे.       देयके स्थगित असल्याने जीवन प्राधिकरण विभागाने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद केला आहे. यामध्ये  मूर्तिजापूर तालुक्यातील २१ गावांचा तर कारंजा तालुक्यातील ३ गावांचा अशा २४ गावांचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी बंद केला आहे. त्याच प्रमाणे देयके स्थगित असल्याने मूर्तिजापूर तालुक्यातील १६ आणि कारंजा तालुक्यातील एका गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे. एकंदरीत ४१ गावांमध्ये जीवन प्राधिकरण विभागानेच कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. या योजनेवर अवलंबून असलेल्या ५७ गावांपैकी १६ गावांनाच पाणी पुरवठा करण्यात येत असून तोही अनियमित असल्याने सदरची योजना भविष्यात कधीही बंद होऊ शकते.   सदर्हू योजनेवर असलेले गावांचे थकबाकीचे कारण दाखवून अख्ख्या गावचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला; पंरतु पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील काहीनी पुर्ण देयके भरलेली असून सुद्धा त्यांनाही याचा फटका बसला आहे.जलकुंभांची स्वच्छता नाहीसध्याच्या स्थितीत या योजने मार्फत १६ गावांना अनियमित गढूळ पाणी पुरवठा होत आहे. प्रत्येक गावातील जलकुंभात (पाण्याची टाकी) प्रचंड प्रमाणात गाळ साचल्याने व पक्षी मरुन पडल्याने गढूळ व मांसाचे तुकडे असलेला पाणी पुरवठा होतो. यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

लाखो रुपये देयका पोटी स्थगित असल्याने १७ गावांचा पाणी पुरवठा तात्पुरता तर २४ कायमस्वरूपी बंद केला आहे. नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, पण पाहीजे तसे सहकार्य होत नसल्याने ४१ गावांचा पाणी पुरवठा बंद करावा लागला.  तात्पुरता पाणी पुरवठा बंद केलेल्या गावातील लोकांनी देयके भरली तर पाणी पुरवठा पुर्ववत होऊ शकतो.- एम. आर. बोबडे,उपविभागीय अभियंता जीवन प्राधिकरण, मूर्तिजापूर

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर