शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अकोला एमआयडीसीला पुन्हा खांबोरा येथून पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 15:03 IST

अकोला : एमआयडीसी परिसराला होत असलेला दूषित पाणी पुरवठा अखेर बंद झाला असून, खांबोराच्या पाणी पुरवठा योजनेमधून शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.

अकोला : एमआयडीसी परिसराला होत असलेला दूषित पाणी पुरवठा अखेर बंद झाला असून, खांबोराच्या पाणी पुरवठा योजनेमधून शुद्ध पाणी पुरवठा केला जात आहे.काही दिवसांपासून एमआयडीसीत दूषित पाणी पुरवठा होता, चारशे ते सातशे टीडीएसचे प्रमाण असलेले पाणी परिसरातील कामगार प्राशन करीत असून, त्यांच्या आरोग्यास धोका असल्याची बाब ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर एमआयडीसी प्रशासन खडबडून जागे झाले होते. त्यानंतर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांनी कुंभारी तलावाच्या पाण्याचे नमुने शासकीय यंत्रणेकडे तपासणीसाठी पाठविले. त्यातदेखील पाणी दूषित आढळले. त्यामुळे कुंभारीचा पाणी पुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. दरम्यान, उन्हाळ्यापासून बंद करण्यात आलेला खांबोरा पाणी पुरवठा योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे मात्र पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेल्या कुंभारी तलावाचे पाणी दूषित झाले तरी कसे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.दूषित पाण्याचा निचरा सोडणाऱ्यांचा शोधकुं भारी तलाव परिसरात जे उद्योग आहे, त्यांचा कारखान्याचा सांडवा कुंभारीच्या तलावात सोडला जातो. अशा उद्योगांचा शोध आता सुरू झाला आहे. काही मोजक्या कारखानदारांनी संपूर्ण तलावाचे पाणी दूषित केले आहे. त्या कारखान्याचा शोध घेणे सुरू आहे. यासाठी इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधिकाºयांनी केले आहे; मात्र इंडस्ट्रीजच्या पदाधिकाºयांनी अद्याप यावर भाष्य केलेले नाही. 

एमआयडीसीला दूषित पाणी पुरवठा होत असल्याचे ‘लोकमत’ने समोर आणल्यानंतर आम्ही चाचपणी केली. त्या वृत्तास दुजोरा मिळाल्यानंतर आम्ही तातडीने कुंभारीचा पाणी पुरवठा थांबविला आहे. आता खांबोरातून पाणी पुरवठा होत आहे.- राहुल बन्सोड, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ