शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

काटेपूर्णा धरणातील जलसाठा पुरणार १२० दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:17 IST

८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.

अकोला: काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात २६ दिवसात केवळ ५.३२ टक्के वाढ झाली आहे. २३ जुलै रोजी या धरणात ३.५ टक्के जलसाठा शिल्लक होता. आजमितीस ८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.काटेपूर्णा धरणाचे पाणलोट क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील काटा येथे आहे; परंतु काटानंतर छोटे-मोठे १२ प्रकल्प असून, या प्रकल्पातही अपेक्षित साठा झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी काटेपूर्णा धरणात पोहोचणे कठीण आहे. याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे. काटेपूर्णा धरणाच्या परिसरात जूनपासून आतापर्यंत २४७.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पडणाऱ्या पावसाच्या भरवशावर जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या कुशीत वसलेल्या वान धरणात ७५.८९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाच्या परिसरात आतापर्यंत ८७१.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, दोन ते तीन वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरण शून्य टक्के होते २३ दिवसात या धरणाच्या परिसरात ३७१.० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून, आजमितीस १४.०४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणाची अवस्थाही अशीच होती. या धरणाच्या परिसरात ६१९.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, आजमितीस २०.६७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाच्या परिसरात आतापर्यंत केवळ २६०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शून्य टक्के असलेल्या या धरणात आजमितीस ६.३४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजचा जलसाठाही शून्य टक्के होता. आजमितीस ७.३० टक्के पाणी उपलब्ध आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण