शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

काटेपूर्णा धरणातील जलसाठा पुरणार १२० दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:17 IST

८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.

अकोला: काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात २६ दिवसात केवळ ५.३२ टक्के वाढ झाली आहे. २३ जुलै रोजी या धरणात ३.५ टक्के जलसाठा शिल्लक होता. आजमितीस ८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.काटेपूर्णा धरणाचे पाणलोट क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील काटा येथे आहे; परंतु काटानंतर छोटे-मोठे १२ प्रकल्प असून, या प्रकल्पातही अपेक्षित साठा झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी काटेपूर्णा धरणात पोहोचणे कठीण आहे. याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे. काटेपूर्णा धरणाच्या परिसरात जूनपासून आतापर्यंत २४७.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पडणाऱ्या पावसाच्या भरवशावर जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या कुशीत वसलेल्या वान धरणात ७५.८९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाच्या परिसरात आतापर्यंत ८७१.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, दोन ते तीन वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरण शून्य टक्के होते २३ दिवसात या धरणाच्या परिसरात ३७१.० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून, आजमितीस १४.०४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणाची अवस्थाही अशीच होती. या धरणाच्या परिसरात ६१९.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, आजमितीस २०.६७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाच्या परिसरात आतापर्यंत केवळ २६०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शून्य टक्के असलेल्या या धरणात आजमितीस ६.३४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजचा जलसाठाही शून्य टक्के होता. आजमितीस ७.३० टक्के पाणी उपलब्ध आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण