शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

काटेपूर्णा धरणातील जलसाठा पुरणार १२० दिवस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:17 IST

८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.

अकोला: काटेपूर्णा धरणातील जलसाठ्यात २६ दिवसात केवळ ५.३२ टक्के वाढ झाली आहे. २३ जुलै रोजी या धरणात ३.५ टक्के जलसाठा शिल्लक होता. आजमितीस ८.८२ टक्के उपलब्ध झाला असून, हा जलसाठा १२० दिवसावर अकोलेकरांची तहान भागवू शकतो, असे तज्ज्ञाचे मत आहे.काटेपूर्णा धरणाचे पाणलोट क्षेत्र वाशिम जिल्ह्यातील काटा येथे आहे; परंतु काटानंतर छोटे-मोठे १२ प्रकल्प असून, या प्रकल्पातही अपेक्षित साठा झाला नसल्याने पाणलोट क्षेत्रात पडणारे पावसाचे पाणी काटेपूर्णा धरणात पोहोचणे कठीण आहे. याकरिता पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची गरज आहे. काटेपूर्णा धरणाच्या परिसरात जूनपासून आतापर्यंत २४७.० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पडणाऱ्या पावसाच्या भरवशावर जलसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे.अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्याच्या सीमेवर सातपुडा पर्वत रागांच्या कुशीत वसलेल्या वान धरणात ७५.८९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. या धरणाच्या परिसरात आतापर्यंत ८७१.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, दोन ते तीन वेळा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पातूर तालुक्यातील निर्गुणा धरण शून्य टक्के होते २३ दिवसात या धरणाच्या परिसरात ३७१.० मि.मी. पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून, आजमितीस १४.०४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील मोर्णा धरणाची अवस्थाही अशीच होती. या धरणाच्या परिसरात ६१९.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली असून, आजमितीस २०.६७ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणाच्या परिसरात आतापर्यंत केवळ २६०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. शून्य टक्के असलेल्या या धरणात आजमितीस ६.३४ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. याच तालुक्यातील घुंगशी बॅरेजचा जलसाठाही शून्य टक्के होता. आजमितीस ७.३० टक्के पाणी उपलब्ध आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण