शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

आगर येथे २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:16 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु ...

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून येथे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

गेल्या एक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता कसेबसे आपले जीवन जगत आहे. त्यातच अचानक झालेली ही पाणीटंचाई ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे. खारपाणपट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये कुठेच गोड पाण्याचे स्रोत नसून, गावाशेजारी सुद्धा कुठेच पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. २५ वर्षांपासून या गावाला पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. दर पंचवार्षिक योजनेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधींना गावातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येते. परंतु आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नाही.

या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीत बाळापूर मतदार संघातील आमदार नितीन देशमुख यांनी, आगर गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. गावाच्या पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाणीटंचाईची चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून, गावातील पाणी समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो: मेल

पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आगर परिसरात गेल्या २० दिवसांपासून असलेल्या पाणीटंचाईबाबत नवथळ येथील माजी सरपंच तसेच समाजसेवक राजेंद्र तेलगोटे यांनी १९ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे

वीज वसुली सक्तीमुळे नागरिक त्रस्त

गेल्या एक वर्षापासून कोरोनासंकट कायम असून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे वीज बिल भरावे कसे हा प्रश्न ग्रामीण जनतेसमोर आहे. आता पाणी कर वसुलीची सुद्धा धडक मोहीम सुरू झाल्यामुळे वीजबिल व पाणी बिल भरावे कसे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेने ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.