शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
2
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
3
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
4
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
5
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
6
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
7
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
8
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
9
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
10
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
11
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
12
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा
14
पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण
15
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
16
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
17
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
18
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
19
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
20
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला

आगर येथे २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:16 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु ...

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून येथे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

गेल्या एक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता कसेबसे आपले जीवन जगत आहे. त्यातच अचानक झालेली ही पाणीटंचाई ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे. खारपाणपट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये कुठेच गोड पाण्याचे स्रोत नसून, गावाशेजारी सुद्धा कुठेच पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. २५ वर्षांपासून या गावाला पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. दर पंचवार्षिक योजनेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधींना गावातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येते. परंतु आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नाही.

या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीत बाळापूर मतदार संघातील आमदार नितीन देशमुख यांनी, आगर गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. गावाच्या पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाणीटंचाईची चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून, गावातील पाणी समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो: मेल

पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आगर परिसरात गेल्या २० दिवसांपासून असलेल्या पाणीटंचाईबाबत नवथळ येथील माजी सरपंच तसेच समाजसेवक राजेंद्र तेलगोटे यांनी १९ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे

वीज वसुली सक्तीमुळे नागरिक त्रस्त

गेल्या एक वर्षापासून कोरोनासंकट कायम असून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे वीज बिल भरावे कसे हा प्रश्न ग्रामीण जनतेसमोर आहे. आता पाणी कर वसुलीची सुद्धा धडक मोहीम सुरू झाल्यामुळे वीजबिल व पाणी बिल भरावे कसे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेने ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.