शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

आगर येथे २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:16 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु ...

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून येथे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

गेल्या एक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता कसेबसे आपले जीवन जगत आहे. त्यातच अचानक झालेली ही पाणीटंचाई ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे. खारपाणपट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये कुठेच गोड पाण्याचे स्रोत नसून, गावाशेजारी सुद्धा कुठेच पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. २५ वर्षांपासून या गावाला पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. दर पंचवार्षिक योजनेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधींना गावातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येते. परंतु आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नाही.

या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीत बाळापूर मतदार संघातील आमदार नितीन देशमुख यांनी, आगर गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. गावाच्या पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाणीटंचाईची चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून, गावातील पाणी समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो: मेल

पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आगर परिसरात गेल्या २० दिवसांपासून असलेल्या पाणीटंचाईबाबत नवथळ येथील माजी सरपंच तसेच समाजसेवक राजेंद्र तेलगोटे यांनी १९ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे

वीज वसुली सक्तीमुळे नागरिक त्रस्त

गेल्या एक वर्षापासून कोरोनासंकट कायम असून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे वीज बिल भरावे कसे हा प्रश्न ग्रामीण जनतेसमोर आहे. आता पाणी कर वसुलीची सुद्धा धडक मोहीम सुरू झाल्यामुळे वीजबिल व पाणी बिल भरावे कसे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेने ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.