शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आगर येथे २० दिवसांपासून पाणीपुरवठा बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:16 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु ...

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत येणाऱ्या उगवा, आगर, नवथळ, परितवाडा, पाळोदी, कंचनपूर आदी गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. परंतु खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे विद्युत बिल न भरल्यामुळे गेल्या १५ दिवसांपासून येथे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

गेल्या एक वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ग्रामस्थांच्या हाताला काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता कसेबसे आपले जीवन जगत आहे. त्यातच अचानक झालेली ही पाणीटंचाई ग्रामस्थांच्या जीवावर उठली आहे. खारपाणपट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये कुठेच गोड पाण्याचे स्रोत नसून, गावाशेजारी सुद्धा कुठेच पाण्याची सोय उपलब्ध नाही. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी विकत घेऊन आपली तहान भागवावी लागत आहे. २५ वर्षांपासून या गावाला पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. दर पंचवार्षिक योजनेत जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लोकप्रतिनिधींना गावातील पाणीटंचाईची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येते. परंतु आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नाही.

या पंचवार्षिक विधानसभेच्या निवडणुकीत बाळापूर मतदार संघातील आमदार नितीन देशमुख यांनी, आगर गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवणार असल्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही त्यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही. गावाच्या पाणीटंचाईकडे लोकप्रतिनिधी, अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच पाणीटंचाईची चटके ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून, गावातील पाणी समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

फोटो: मेल

पाणीटंचाईबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आगर परिसरात गेल्या २० दिवसांपासून असलेल्या पाणीटंचाईबाबत नवथळ येथील माजी सरपंच तसेच समाजसेवक राजेंद्र तेलगोटे यांनी १९ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे

वीज वसुली सक्तीमुळे नागरिक त्रस्त

गेल्या एक वर्षापासून कोरोनासंकट कायम असून मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे वीज बिल भरावे कसे हा प्रश्न ग्रामीण जनतेसमोर आहे. आता पाणी कर वसुलीची सुद्धा धडक मोहीम सुरू झाल्यामुळे वीजबिल व पाणी बिल भरावे कसे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या चिंतेने ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.