शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:09 IST

जिल्ह्यात सर्वात मोठे १० वक्रद्वाराच्या महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर पोहोचला आहे.

महान : महान धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठी धरणे व लघु तलाव तुडुंब भरले आहेत. जिल्ह्यात सर्वात मोठे १० वक्रद्वाराच्या महान धरणाचा जलसाठा प्रथमच १०० टक्क्यांवर पोहोचला आहे.१ आॅगस्ट ते २१ सप्टेंबरदरम्यान महान धरणाचे १४ वेळा वक्रद्वार उघडून अतिरिक्त पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे. सर्वप्रथम धरणाचे वक्रद्वार १ आॅगस्ट, १२ आॅगस्ट, १४ आॅगस्ट, १७ आॅगस्ट, २१ आॅगस्ट, २८ आॅगस्ट, ४ सप्टेंबर, ९ सप्टेंबर, १० सप्टेंबर रोजी दोन वेळा, १३ सप्टेंबर, १७ सप्टेंबर, १७ सप्टेंबर, २० सप्टेंबर आणि २१ सप्टेंबर म्हणजे आॅगस्ट महिन्यात सहा वेळा आणि सप्टेंबर महिन्यात आठ वेळा असे एकूण १४ वेळा महान धरणाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. या १४ वेळेस उघडलेल्या वक्रद्वारामधून नदीपात्रात १२१.६८४ दलघमी म्हणजे १४०.०९१ टक्के पाण्याचा विसर्ग झाला आहे. धरणात उपलब्ध असलेल्या १०० टक्के जलसाठा आणि नदीपात्रात विसर्ग झालेला १४०.०९१ टक्के हा आश्चर्यजनक आकडा महान धरणाने पार केला आहे. महान धरणातून यावर्षी १४०.०९१ टक्के एवढ्या पाण्याचा विसर्ग झाला. महान धरण पाणलोट क्षेत्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने पंधराव्यांदा लवकरच धरणाचे वक्रद्वार उघडण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkolaअकोला