शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कंचनपूर गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई : ग्रामस्थांना 'झिऱ्या' चा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 17:36 IST

झिरे करून त्या झिऱ्याच्या पाण्यावर गावकरी तहान भागवत असल्याचे भीषण दृश्य कंचनपूर गावात पाहण्यास मिळत आहे.

- संतोष गव्हाळे

हातरुण : खारपाणपट्ट्यात असलेल्या कंचनपूर येथे गत महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हातपंपांना खारे पाणी, अशी विदारक स्थिती असून, टँकरही गावात पोहोचत नाहीत. त्यामुळे झिरे करून त्या झिऱ्याच्या पाण्यावर गावकरी तहान भागवत असल्याचे भीषण दृश्य कंचनपूर गावात पाहण्यास मिळत आहे.अकोला तालुक्यातील कंचनपूर गावाची १,५०० लोकसंख्या असून, गावात सर्व सोयी-सुविधा असताना पिण्यासाठी पाणी नाही. गावातील चार हातपंप असून, त्यांना खारे पाणी आहे. कंचनपूर गावाला काटेपूर्णा येथून पाणीपुरवठा होतो. या योजनेवरील शेवटचे गाव कंचनपूर असल्याने पाणी वेळेवर पोहचत नाही; मात्र गेल्या एका महिन्यापासून कंचनपूर गावात पाणी पोहोचले नसल्याचे उपसरपंच शिवशंकर डिक्कर यांनी सांगितले. गावात जलकुंभ असून, काटेपूर्णा येथून या जलकुंभात काही दिवसांपासून पाणीच पोहोचत नसल्याने गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.कंचनपूर गावातील नागरिक भर उन्हात हंडा भरणे, पाण्याची कॅन, बैलगाडीने पाणी आणताना दिसून येतात. गावाजवळून वाहणाºया नाल्यात सध्या पाणी नाही. या नाल्याच्या पात्रात गावकऱ्यांनी पाच ते सहा झिरे केलेले आहेत. या झिºयात पाणी जमा झाले की ग्लासाने हंडा भरल्या जातो. एक हंडा भरण्यासाठी बराच वेळ लागतो. रेकॉर्ड ब्रेक उन्हात ग्रामस्थ झिºयाजवळ पाणी भरताना दिसून येतात. या समस्येकडे लक्ष देण्यास लोकप्रितनिधी आणि अधिकाºयांना वेळ नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. झिºयाच्या पाण्यामुळे ग्रामस्थांना पोटाचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून ग्रामपंचयातने जिल्हा परिषद प्रशासनाला ठराव दिला आहे; मात्र अधिकाºयांच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांची पाण्यासाठी भर उन्हात पायपीट सुरू आहे. कंचनपूर येथील पाणीटंचाई दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी विनोद चोरे, कविश गवाळे, आनंद गावंडे, आनंद चोरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. कंचनपूर गावातील पाणीटंचाईवर उपाययोजना करताना मुहूर्ताची वाट पाहू नका, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला