शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

कंचनपूर गावात एक महिन्यापासून पाणीटंचाई : ग्रामस्थांना 'झिऱ्या' चा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 17:36 IST

झिरे करून त्या झिऱ्याच्या पाण्यावर गावकरी तहान भागवत असल्याचे भीषण दृश्य कंचनपूर गावात पाहण्यास मिळत आहे.

- संतोष गव्हाळे

हातरुण : खारपाणपट्ट्यात असलेल्या कंचनपूर येथे गत महिनाभरापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. हातपंपांना खारे पाणी, अशी विदारक स्थिती असून, टँकरही गावात पोहोचत नाहीत. त्यामुळे झिरे करून त्या झिऱ्याच्या पाण्यावर गावकरी तहान भागवत असल्याचे भीषण दृश्य कंचनपूर गावात पाहण्यास मिळत आहे.अकोला तालुक्यातील कंचनपूर गावाची १,५०० लोकसंख्या असून, गावात सर्व सोयी-सुविधा असताना पिण्यासाठी पाणी नाही. गावातील चार हातपंप असून, त्यांना खारे पाणी आहे. कंचनपूर गावाला काटेपूर्णा येथून पाणीपुरवठा होतो. या योजनेवरील शेवटचे गाव कंचनपूर असल्याने पाणी वेळेवर पोहचत नाही; मात्र गेल्या एका महिन्यापासून कंचनपूर गावात पाणी पोहोचले नसल्याचे उपसरपंच शिवशंकर डिक्कर यांनी सांगितले. गावात जलकुंभ असून, काटेपूर्णा येथून या जलकुंभात काही दिवसांपासून पाणीच पोहोचत नसल्याने गावातील नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे.कंचनपूर गावातील नागरिक भर उन्हात हंडा भरणे, पाण्याची कॅन, बैलगाडीने पाणी आणताना दिसून येतात. गावाजवळून वाहणाºया नाल्यात सध्या पाणी नाही. या नाल्याच्या पात्रात गावकऱ्यांनी पाच ते सहा झिरे केलेले आहेत. या झिºयात पाणी जमा झाले की ग्लासाने हंडा भरल्या जातो. एक हंडा भरण्यासाठी बराच वेळ लागतो. रेकॉर्ड ब्रेक उन्हात ग्रामस्थ झिºयाजवळ पाणी भरताना दिसून येतात. या समस्येकडे लक्ष देण्यास लोकप्रितनिधी आणि अधिकाºयांना वेळ नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. झिºयाच्या पाण्यामुळे ग्रामस्थांना पोटाचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावातील पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून ग्रामपंचयातने जिल्हा परिषद प्रशासनाला ठराव दिला आहे; मात्र अधिकाºयांच्या उदासीन धोरणामुळे नागरिकांची पाण्यासाठी भर उन्हात पायपीट सुरू आहे. कंचनपूर येथील पाणीटंचाई दूर करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी विनोद चोरे, कविश गवाळे, आनंद गावंडे, आनंद चोरे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. कंचनपूर गावातील पाणीटंचाईवर उपाययोजना करताना मुहूर्ताची वाट पाहू नका, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य राम गव्हाणकर यांनी केली आहे.

 

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईAkolaअकोला