शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

६४ गावांमध्ये पाणीटंचाई; ग्रामस्थांची पायपीट

By admin | Updated: October 23, 2014 02:02 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती.

अकोला: खारपाणपट्टय़ातील जिल्ह्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सध्या या गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या कालावधीतही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत ६४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोरा जवळील उन्नई बंधार्‍यात पाणी सोडले जाते आणि उन्नई बंधार्‍यातून ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षींच्या पावसाळ्यात सार्वत्रिक दमदार पावसाअभावी महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत, या धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात उन्नई बंधार्‍यातील जलसाठा संपल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गेल्या १५ दिवसात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गत १८ ऑक्टोबर रोजी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी उन्नई बंधार्‍यात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर या योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सध्या या योजनेंतर्गत गावांना सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.