शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

६४ गावांमध्ये पाणीटंचाई; ग्रामस्थांची पायपीट

By admin | Updated: October 23, 2014 02:02 IST

खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती.

अकोला: खारपाणपट्टय़ातील जिल्ह्यातल्या खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांमध्ये पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, सध्या या गावांना आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या कालावधीतही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत ६४ गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोरा जवळील उन्नई बंधार्‍यात पाणी सोडले जाते आणि उन्नई बंधार्‍यातून ६४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. यावर्षींच्या पावसाळ्यात सार्वत्रिक दमदार पावसाअभावी महान येथील काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत, या धरणातील उपलब्ध जलसाठा अकोला शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात उन्नई बंधार्‍यातील जलसाठा संपल्याने, खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना गेल्या १५ दिवसात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार गत १८ ऑक्टोबर रोजी महान येथील काटेपूर्णा धरणातून खांबोरा पाणीपुरवठा योजनेसाठी उन्नई बंधार्‍यात पाणी सोडण्यात आले. त्यानंतर या योजनेंतर्गत गावांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. सध्या या योजनेंतर्गत गावांना सात दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. काटेपूर्णा धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल्याच्या स्थितीत खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत हिवाळ्यातच पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे.