शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अंदुरा परिसरात ऐन हिवाळ्यात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST

प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना कारंजा रमअंतर्गत अंदुरासह परिसरातील दहा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु मागील काही दिवसांपासून परिसरात राष्ट्रीय ...

प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना कारंजा रमअंतर्गत अंदुरासह परिसरातील दहा गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो; परंतु मागील काही दिवसांपासून परिसरात राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना खोदकाम करतेवेळी ही जलवाहिनी फुटली व शेकडो लीटर पाण्याचा वाहून गेले. ही जलवाहिनी दुरुस्ती करण्याचे काम जलवाहिनी फुटल्या दिवसापासून सुरू असून, कर्मचाऱ्यांच्या दिरंगाईमुळे या जलवाहिनी दुरुस्ती करण्याच्या कामाला विलंब होत आहे. परिणामी परिसरातील गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कारंजा रम येथून अंदुरा परिसरातील सोनाळा, कारंजा, नया अंदुरा, हाता, लोणाग्रा, शिंगोली, हातला, निंबा फाटा, आडसूळ इत्यादी गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. कारंजा रम प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजना येथे ११ बोअरवेल असून, त्यापैकी ६ बोअरवेल पूर्णपणे आतल्या असून, २ बोअरवेल महामार्गाच्या कामात बाधित झाल्या, तर उर्वरित ३ बोअरवेल वरुण परिसरातील १० गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. येथून पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पूर्णपणे जीर्ण झाली असून, २ ते ३ किमी अंतरामध्ये ५ ते ६ ठिकाणी गळती लागली आहे. या गळती झालेल्या ठिकाणावरून जागोजागी गटारी तयार झाल्या आहेत. त्यामधून दूषित पाणी जलवाहिनीत जाऊन पाणीपुरवठा दूषित होत आहे. या संदर्भात वेळोवेळी कर्मचार्‍यांना सांगूनसुद्धा गळती काढण्याच्या कामात येथील कर्मचारी हलगर्जी करीत आहेत. तरी वरिष्ठांनी दखल येथील कर्मचाऱ्यांची कानउघडणी करून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.