शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 18:28 IST

अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.

अकोला : विदर्भातील फळबागांवर पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून, अनेक भागात संत्रा,लिंबू व इतर फळपिकांच्या बागा वाळू लागल्या आहेत. झाडे वाचवायची असतील अशा परिस्थितीत फळांचा बहारच घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.विदर्भात १ लाख ३० हेक्टर संत्रा असून, लिंबाचे क्षेत्र २७ हजार हेक्टरपर्यंत आहे. संपूर्ण राज्यात संत्रा १ लाख ५० हजार हेक्टर,मोसंबी ९० हजार तर लिंबूचे क्षेत्र ५० हजार हेक्टर आहे.यासह इतर फळ झाडांवर यावर्षी पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले.२०१६-१७ व २०१८ मध्ये कमी पाऊस झाल्याने यावर्षी भूजल पातळी घटली. बहुतांश ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आटले आहेत.या परिस्थितीत फळ झाडांना पाणीच मिळत नसल्याने झाडे वाळण्याच्या स्थितीत आहेत.ही झाडे टिकवायची असतील तर शेतकऱ्यांनी कोणताच बहार घेऊ नये असा सल्ला कृषी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना दिला. झाडावर फळे जर असतील तर पाणी जास्त लागते. ज्या शेतकºयांकडे पाणी उपलब्ध असेल त्या शेतकºयांनी ठिबक सिंचन करावे, झाडांच्या बुंध्याजवळ गांडूळ खत टाकावे, पाला पाचोळाही टाकावा तसेच ३० मायक्रॉन चे मल्चींग करावे. म्हणजे झाडांचे संरक्षण करता येईल. तसेच पाणी देताना प्रथम एका दांडाने व दुसरी पाळी देताना दुसºयां दांडाने पाणी द्यावे त्यामुळे झाडांच्या दोन्ही बाजुने ओलावा राहील. झाड टिकवता येईल. एप्रिल - मे महिन्यात तापमान वाढणार असल्याने शेतकºयांनी फळझाडांची काळजी घेणे गरजेचे आहे.- जलस्त्रोत घटल्याने फळझाडांवर परिणाम होत आहे.म्हणून यावर्षी शेतकºयांनी संत्रा,लिंबू व इतर फळांचा बहार न घेता पाण्याचे व्यवस्थापन करावे. ठिबक सिंचन,मल्चींग,गांडूळ खत आदीसह कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार व्यवस्थापन करावे.डॉ. दिनेश पैठणकर,प्रमुख,लिंबूवर्गीय फळे संशोधन केंद्र,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती