शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

अमरावती विभागातील ७,२४१ गावांमध्ये पाणी टंचाई

By admin | Updated: November 23, 2014 00:03 IST

अत्यल्प पावसाचा परिणाम: जमिनीतील पाण्याची पातळी घटली.

खामगाव (बुलडाणा): अत्यल्प पावसामुळे अमरावती विभागातील तब्बल ७,२४१ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. पाणी टंचाई निवारणार्थ राज्याच्या तिजोरीवर यावर्षी कोट्यवधी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे.अतवृष्टीमुळे २0१३ मध्ये अमरावती विभागातील अनेक तालुक्यांमध्ये मुबलक पाणी साठा होता. त्यामुळे विभागातील काही गावे टँकरमुक्त झाली होती. यंदा मात्र अत्यल्प पाऊस पडला. परिणामी विभागातील तब्बल ७,२४१ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती आहे. त्यापैकी बहुतांश गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी राज्यातील काही तालुक्यांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला, तर काही तालुक्यांमध्ये २५ टक्यांपेक्षाही कमी पाऊस पडला. काही तालुक्यांमध्ये ५0 टक्यांच्या आत पाऊस पडला. कमी पावसाच्या पट्टयामध्ये अमरावती विभागातील अमरावती वगळता उर्वरित यवतमाळ, बुलडाणा, अकोला व वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. अत्यल्प पावसामुळे या चार जिल्ह्यांमधील भूजल पातळी घटली आहे. अनेक जलसाठय़ांमध्येही अत्यल्प जलसाठा असल्याने, अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, शासनाला पाणी टंचाई निवारार्थ पर्यायी स्त्रोतांबाबत उपाययोजना करावी लागणार असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करावी लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. *अनेक गावे झाली होती टँकरमुक्त!अतवृष्टीमुळे २0१२-१३ मध्ये विभागातील काही गावांमध्ये ओला दुष्काळ पडला होता. धरणे तुडूंब भरली होती. त्यामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याने, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला होता; मात्र यावर्षी परिस्थिती बिकट असल्यामुळे शासनाला पाणी टंचाई निवारण्यासाठी विशेष तरतूद करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.