शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

अमरावती विभागातील ७,२४१ गावांमध्ये पाणी टंचाई

By admin | Updated: November 23, 2014 00:03 IST

अत्यल्प पावसाचा परिणाम: जमिनीतील पाण्याची पातळी घटली.

खामगाव (बुलडाणा): अत्यल्प पावसामुळे अमरावती विभागातील तब्बल ७,२४१ गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे. पाणी टंचाई निवारणार्थ राज्याच्या तिजोरीवर यावर्षी कोट्यवधी रुपयांचा भार पडण्याची शक्यता आहे.अतवृष्टीमुळे २0१३ मध्ये अमरावती विभागातील अनेक तालुक्यांमध्ये मुबलक पाणी साठा होता. त्यामुळे विभागातील काही गावे टँकरमुक्त झाली होती. यंदा मात्र अत्यल्प पाऊस पडला. परिणामी विभागातील तब्बल ७,२४१ गावांमध्ये टंचाईसदृश परिस्थिती आहे. त्यापैकी बहुतांश गावांना हिवाळ्यातच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर्षी राज्यातील काही तालुक्यांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडला, तर काही तालुक्यांमध्ये २५ टक्यांपेक्षाही कमी पाऊस पडला. काही तालुक्यांमध्ये ५0 टक्यांच्या आत पाऊस पडला. कमी पावसाच्या पट्टयामध्ये अमरावती विभागातील अमरावती वगळता उर्वरित यवतमाळ, बुलडाणा, अकोला व वाशिम या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. अत्यल्प पावसामुळे या चार जिल्ह्यांमधील भूजल पातळी घटली आहे. अनेक जलसाठय़ांमध्येही अत्यल्प जलसाठा असल्याने, अनेक गावांमध्ये तीव्र पाणी टंचाईचे संकेत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, शासनाला पाणी टंचाई निवारार्थ पर्यायी स्त्रोतांबाबत उपाययोजना करावी लागणार असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करावी लागेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. *अनेक गावे झाली होती टँकरमुक्त!अतवृष्टीमुळे २0१२-१३ मध्ये विभागातील काही गावांमध्ये ओला दुष्काळ पडला होता. धरणे तुडूंब भरली होती. त्यामुळे अनेक गावे टँकरमुक्त झाल्याने, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला होता; मात्र यावर्षी परिस्थिती बिकट असल्यामुळे शासनाला पाणी टंचाई निवारण्यासाठी विशेष तरतूद करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.