शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
4
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
5
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
6
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
7
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
8
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
9
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
10
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
11
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
12
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
13
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
14
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
15
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
16
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
17
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
18
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
19
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट

भूजल पुनर्भरणासाठी अकोला जिल्हय़ात ‘जलदेवो भव:’!

By admin | Updated: April 20, 2016 02:23 IST

पाणीटंचाईवर मात करण्याची जिल्हाधिका-यांची संकल्पना.

संतोष येलकर / अकोलावारंवार उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी पाऊस पाण्याचे संकलन करून, भूजल पुनर्भरण करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून जिल्हय़ात ह्यजलदेवो भव:ह्ण हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे.वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण आणि कालावधी अनिश्‍चित झाल्याने, पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे जिल्हय़ाला अवर्षण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, तापत्या उन्हासोबतच अकोला जिल्हय़ातील विविध भागात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहीर व कूपनलिकांचा वापर करता येतो. शहरी आणि ग्रामीण भागात घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाइपचा उपयोग करून संकलित करून शोषखड्डय़ात तसेच कूपनलिकेत सोडल्यास भूजल पुनर्भरण करणे शक्य आहे. तसेच कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब मुरविण्यास जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते, त्याचा पीक उत्पादनासाठीही फायदा होतो. या पृष्ठभूमीवर मान्सून कालावधीत पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब जिरविण्यासाठी जिल्हय़ातील गावागावात सरपंच, ग्रामसेवक व कृषिसेवकांमार्फत १५ जूनपर्यंत ह्यजलदेवो भव:ह्ण हा जलपुनर्भरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी एक परिपत्रक काढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकार्‍यांसह विविध विभागप्रमुखांना पाठविले.