शहरं
Join us  
Trending Stories
1
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
2
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
3
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
4
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
5
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
6
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
7
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
8
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
9
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
10
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
11
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
12
ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक
13
VIRAL : खोदकाम करताना सापडलं १९९७चं जलजीऱ्याचं पाकिट; पण सोशल मीडियावर का होतंय व्हायरल?
14
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
15
BCCI नं श्रेयस अय्यरला दिलं कॅप्टन्सीचं गिफ्ट; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ
16
'तो खोटं बोलला, हॉटेलमध्ये जाताच त्याने माझी...'; विधवा सासूने जावयावर केला खळबळजनक आरोप
17
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
Raja Raghuvanshi : कट, खून अन् पुरावे... मेघालय पोलिसांनी तब्बल ७९० पानांमध्ये नोंदवला सोनम रघुवंशी आणि राजचा गुन्हा!

भूजल पुनर्भरणासाठी अकोला जिल्हय़ात ‘जलदेवो भव:’!

By admin | Updated: April 20, 2016 02:23 IST

पाणीटंचाईवर मात करण्याची जिल्हाधिका-यांची संकल्पना.

संतोष येलकर / अकोलावारंवार उद्भवणार्‍या पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यासाठी पाऊस पाण्याचे संकलन करून, भूजल पुनर्भरण करण्यासाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून जिल्हय़ात ह्यजलदेवो भव:ह्ण हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे.वातावरणातील बदलामुळे गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण आणि कालावधी अनिश्‍चित झाल्याने, पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे जिल्हय़ाला अवर्षण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, तापत्या उन्हासोबतच अकोला जिल्हय़ातील विविध भागात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. भूजल पुनर्भरण करण्यासाठी विहीर व कूपनलिकांचा वापर करता येतो. शहरी आणि ग्रामीण भागात घराच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी पाइपचा उपयोग करून संकलित करून शोषखड्डय़ात तसेच कूपनलिकेत सोडल्यास भूजल पुनर्भरण करणे शक्य आहे. तसेच कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब मुरविण्यास जमिनीत दीर्घकाळ ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होते, त्याचा पीक उत्पादनासाठीही फायदा होतो. या पृष्ठभूमीवर मान्सून कालावधीत पडणार्‍या पावसाचा प्रत्येक थेंब जिरविण्यासाठी जिल्हय़ातील गावागावात सरपंच, ग्रामसेवक व कृषिसेवकांमार्फत १५ जूनपर्यंत ह्यजलदेवो भव:ह्ण हा जलपुनर्भरणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी सोमवारी एक परिपत्रक काढून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकार्‍यांसह विविध विभागप्रमुखांना पाठविले.