शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

काटेपूर्णा धरणात वाढवावे लागेल पाण्याचे आरक्षण!

By admin | Updated: September 6, 2016 02:23 IST

काटेपूर्णा धरणात जलसाठा ८८ टक्के तहानलेल्या गावांना द्यावे लागेल पाणी!

अकोला, दि. ५ : मनपा क्षेत्र वाढल्याने शहरालगतच्या तहानलेल्या गावांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार असल्याने काटेपूर्णा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणातील जलसाठा वाढताच असून, शुक्रवारी या धरणाचा जलसाठा ८८ टक्क्याने वाढला आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, जलसाठा वाढताच शेतकर्‍यांनी आताच खरीप हंगामातील पिकांना पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तर जिल्हय़ातील उमा, निगरुणा धरणे शंभर टक्के भरली असून, पातूर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठा २४.७२ दलघमी म्हणजेच (५९.६२ टक्के) झाला आहे. निगरुणा २८.८५ दलघमी (१00 टक्के) जलसाठा असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा ११.६८ दलघमी (१00 टक्के) आहे. तेल्हारा तालुक्यातील वान ७२.९४ दलघमी (८९.00 टक्के), तर बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या धरणात ४.४८ दलघमी म्हणजेच ४३.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. ३१ लघू प्रकल्पांपैकी २0 प्रकल्प ओव्हर फ्लो आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे धरणात मुबलक जलसाठा संकलित न झाल्याने रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी मिळाले नाही. यावर्षी प्रथमच ८८ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. त्यामुळे पिकांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२४ गावांच्या पाण्याची सोय महापालिकेची हद्दवाढ झाल्याने महापालिका क्षेत्रात आता २४ गावांचा समावेश झाला आहे. या चोवीस गावातील बहुतांश गावात अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. अकोला शहराला लागूनच असलेल्या गुडधी गावात तर अद्यापही पाणी पुरवठा सुरू झाला नसल्याने येथील नागरिकांना वर्षानुवर्षे खारपाणपट्टय़ातील नागरिकांला हातपंपाचे खारे पाणी सेवन करावे लागत आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार आहेत; पण गोडेपाणीच नसल्याने येथील नागरिकांसमोर खार्‍या पाण्याचा पर्याय आहे. या पाण्याचे दुष्परिणाम नागरिकांना सोसावे लागत आहेत. त्यामुळे मन पाला काटेपूर्णा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार असून, या गावांची पिण्याच्या पाण्याची सोयही करावी लागणार आहे.