शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

काटेपूर्णा धरणात वाढवावे लागेल पाण्याचे आरक्षण!

By admin | Updated: September 6, 2016 02:23 IST

काटेपूर्णा धरणात जलसाठा ८८ टक्के तहानलेल्या गावांना द्यावे लागेल पाणी!

अकोला, दि. ५ : मनपा क्षेत्र वाढल्याने शहरालगतच्या तहानलेल्या गावांची पिण्याच्या पाण्याची सोय करावी लागणार असल्याने काटेपूर्णा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणातील जलसाठा वाढताच असून, शुक्रवारी या धरणाचा जलसाठा ८८ टक्क्याने वाढला आहे. त्यामुळे यावर्षी रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी सोडले जाणार आहे. दरम्यान, जलसाठा वाढताच शेतकर्‍यांनी आताच खरीप हंगामातील पिकांना पाणी सोडण्याची मागणी केली आहे. तर जिल्हय़ातील उमा, निगरुणा धरणे शंभर टक्के भरली असून, पातूर तालुक्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पातील जलसाठा २४.७२ दलघमी म्हणजेच (५९.६२ टक्के) झाला आहे. निगरुणा २८.८५ दलघमी (१00 टक्के) जलसाठा असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा ११.६८ दलघमी (१00 टक्के) आहे. तेल्हारा तालुक्यातील वान ७२.९४ दलघमी (८९.00 टक्के), तर बाश्रीटाकळी तालुक्यातील दगडपारवा या धरणात ४.४८ दलघमी म्हणजेच ४३.९६ टक्के जलसाठा संचयित झाला आहे. ३१ लघू प्रकल्पांपैकी २0 प्रकल्प ओव्हर फ्लो आहेत.मागील तीन ते चार वर्षांपासून पावसाच्या अनिश्‍चिततेमुळे धरणात मुबलक जलसाठा संकलित न झाल्याने रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी मिळाले नाही. यावर्षी प्रथमच ८८ टक्के जलसाठा संकलित झाला आहे. त्यामुळे पिकांना पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.२४ गावांच्या पाण्याची सोय महापालिकेची हद्दवाढ झाल्याने महापालिका क्षेत्रात आता २४ गावांचा समावेश झाला आहे. या चोवीस गावातील बहुतांश गावात अद्याप कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही. अकोला शहराला लागूनच असलेल्या गुडधी गावात तर अद्यापही पाणी पुरवठा सुरू झाला नसल्याने येथील नागरिकांना वर्षानुवर्षे खारपाणपट्टय़ातील नागरिकांला हातपंपाचे खारे पाणी सेवन करावे लागत आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार आहेत; पण गोडेपाणीच नसल्याने येथील नागरिकांसमोर खार्‍या पाण्याचा पर्याय आहे. या पाण्याचे दुष्परिणाम नागरिकांना सोसावे लागत आहेत. त्यामुळे मन पाला काटेपूर्णा धरणातील पाण्याचे आरक्षण वाढवावे लागणार असून, या गावांची पिण्याच्या पाण्याची सोयही करावी लागणार आहे.