शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

जलपुनर्भरणच तारणार!

By admin | Updated: May 7, 2017 23:48 IST

खारपानपट्टय़ातील भीषण वास्तव: शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज.

राजरत्न सिरसाटअकोला : भूगर्भातील पाण्याचा अनेक प्रकारे प्रचंड उपसा सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने घसरण होत आहे. गत काही वर्षांत पावसाचा आलेख घसरला असून, याचा विपरित परिनाम पीक परिस्थितीवर झाला आहे. या पृष्ठभूमीवर शेतात जलपुनर्भरण हाच एकमेव पर्याय असून, याकरिता शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.खारपाणपट्टय़ात आजमितीस ४00 गावांपर्यंत नळ योजना पोहोचली असून, उर्वरित गावे मात्र पाणी दुर्भिक्षाच्या झळा सोसत आहेत. या ४00 खेड्यांना वेळेवर व पूरक पाणी मिळत नसल्याच्या सातत्याने तक्रारी सुरू च आहेत. खारपाणपट्टय़ातील पूर्णा नदीच्या चंद्रभागा, काटेपूर्णा, मोर्णा या उपनद्यांच्या काठालगत काहीसे गोडे पाणी शेतकरी उचलतात; पण उर्वरित सर्वच भागात खारे पाणी आहे. या भागात ६0 ते ७0 फुटांवर पाणी उपलब्ध आहे. सर्व पाणी प्रचंड खारे आणि फ्लोराईड, नायट्रेट, आम्लयुक्त असल्याने हे पाणी सेवनास घातक आहे. या जिल्हय़ात विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण करू न पशुधनाची माहिती गोळा केली आहे. या सर्वेक्षणात मुख्यत्वे उन्हाळ्यात पशूंमध्ये किडनीचे आजार दिसून आले आहेत. त्यांच्यामध्ये मिठाचे प्रमाण दुपटीने वाढल्याचेही निष्पन्न झाले आहे. जनावरांमध्ये पाण्यात विरघळलेले क्षार हे साधारणत: ५00 टीडीएस असतात. खारपाणपट्टय़ातील पशूंमध्ये हे प्रमाण ६000 टीडीएस म्हणजे दहापट दिसून आले आहे. त्याचा प्राण्यावरही प्रतिकूल परिणाम होत आहेत.-देशात कर्नाल येथे एकच खारपाणपट्टा संशोधन केंद्र देशात केवळ हरियाणा राज्यातील कर्नाल येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे एकमेव केंद्रीय माती खारपाणपट्टा संशोधन केंद्र आहे. त्यामुळे या भागात दुसरे केंद्र देण्यास वाव आहे. अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेकडे जागा उपलब्ध आहे, संसाधने आहेत. केवळ या केंद्रासाठी काही पदांची सोय करावी लागणार आहे.- कृषीसाठी स्वतंत्र केंद्राचा प्रस्ताव धूळ खात खारपाणपट्टय़ाचा कृषी व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, त्यासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र या भागात देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने राज्य शासनाला प्रस्ताव दिला आहे. शासनाने अद्याप त्या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही. अशावेळी पशू, पक्षी संशोधन केंद्र मिळेल का, असा प्रश्न येथील पशुवैद्यक संस्थेच्या शास्त्रज्ञांना पडला आहे. - जलसंवर्धनासाठी जलपुनर्भरण करणे हाच एकमेव पर्याय आहे. शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेली जलसंधारणाची कामे तर व्हावीच, शिवाय शेतकर्‍यांनीदेखील शेतात पुनर्भरणाची कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने अनेक शिफारशी केलेल्या आहेत.- डॉ. सुभाष टाले,विभाग प्रमुख, मृद व जलसंधारण विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला.