शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर EMI मध्ये तुर्तास दिलासा नाही, रेपो दर जैसे थे; ईएमआय कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार
2
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनचे वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
3
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
4
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
5
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
6
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
7
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
8
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
9
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
10
'कल्कि २' मधून बाहेर पडल्यानंतर दीपिका पादुकोणचं मोठं वक्तव्य; म्हणाली- 'मी नेहमी माझ्या अटींवर...'
11
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
12
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
13
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
14
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
15
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
16
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
17
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
18
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
19
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
20
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला

जलपुनर्भरणच तारणार!

By admin | Updated: May 7, 2017 23:48 IST

खारपानपट्टय़ातील भीषण वास्तव: शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज.

राजरत्न सिरसाटअकोला : भूगर्भातील पाण्याचा अनेक प्रकारे प्रचंड उपसा सुरू असल्याने पाण्याच्या पातळीत झपाट्याने घसरण होत आहे. गत काही वर्षांत पावसाचा आलेख घसरला असून, याचा विपरित परिनाम पीक परिस्थितीवर झाला आहे. या पृष्ठभूमीवर शेतात जलपुनर्भरण हाच एकमेव पर्याय असून, याकरिता शेतकर्‍यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.खारपाणपट्टय़ात आजमितीस ४00 गावांपर्यंत नळ योजना पोहोचली असून, उर्वरित गावे मात्र पाणी दुर्भिक्षाच्या झळा सोसत आहेत. या ४00 खेड्यांना वेळेवर व पूरक पाणी मिळत नसल्याच्या सातत्याने तक्रारी सुरू च आहेत. खारपाणपट्टय़ातील पूर्णा नदीच्या चंद्रभागा, काटेपूर्णा, मोर्णा या उपनद्यांच्या काठालगत काहीसे गोडे पाणी शेतकरी उचलतात; पण उर्वरित सर्वच भागात खारे पाणी आहे. या भागात ६0 ते ७0 फुटांवर पाणी उपलब्ध आहे. सर्व पाणी प्रचंड खारे आणि फ्लोराईड, नायट्रेट, आम्लयुक्त असल्याने हे पाणी सेवनास घातक आहे. या जिल्हय़ात विद्यार्थी, शास्त्रज्ञांनी सर्वेक्षण करू न पशुधनाची माहिती गोळा केली आहे. या सर्वेक्षणात मुख्यत्वे उन्हाळ्यात पशूंमध्ये किडनीचे आजार दिसून आले आहेत. त्यांच्यामध्ये मिठाचे प्रमाण दुपटीने वाढल्याचेही निष्पन्न झाले आहे. जनावरांमध्ये पाण्यात विरघळलेले क्षार हे साधारणत: ५00 टीडीएस असतात. खारपाणपट्टय़ातील पशूंमध्ये हे प्रमाण ६000 टीडीएस म्हणजे दहापट दिसून आले आहे. त्याचा प्राण्यावरही प्रतिकूल परिणाम होत आहेत.-देशात कर्नाल येथे एकच खारपाणपट्टा संशोधन केंद्र देशात केवळ हरियाणा राज्यातील कर्नाल येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे एकमेव केंद्रीय माती खारपाणपट्टा संशोधन केंद्र आहे. त्यामुळे या भागात दुसरे केंद्र देण्यास वाव आहे. अकोल्यातील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थेकडे जागा उपलब्ध आहे, संसाधने आहेत. केवळ या केंद्रासाठी काही पदांची सोय करावी लागणार आहे.- कृषीसाठी स्वतंत्र केंद्राचा प्रस्ताव धूळ खात खारपाणपट्टय़ाचा कृषी व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून, त्यासाठी स्वतंत्र संशोधन केंद्र या भागात देण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेने राज्य शासनाला प्रस्ताव दिला आहे. शासनाने अद्याप त्या प्रस्तावाची दखल घेतलेली नाही. अशावेळी पशू, पक्षी संशोधन केंद्र मिळेल का, असा प्रश्न येथील पशुवैद्यक संस्थेच्या शास्त्रज्ञांना पडला आहे. - जलसंवर्धनासाठी जलपुनर्भरण करणे हाच एकमेव पर्याय आहे. शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येत असलेली जलसंधारणाची कामे तर व्हावीच, शिवाय शेतकर्‍यांनीदेखील शेतात पुनर्भरणाची कामे करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठाने अनेक शिफारशी केलेल्या आहेत.- डॉ. सुभाष टाले,विभाग प्रमुख, मृद व जलसंधारण विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला.