शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

मूर्तिजापुरात ‘पाण्याचा’ पैसा!

By admin | Updated: April 18, 2017 20:18 IST

मूर्तिजापूर- शहरात अनेक ठिकाणी पाणी थंड करून विकण्याचा सपाटा व्यावसायिकांनी लावला आहे. शुद्धतेची खातरजमा केली जात नसल्याने पाणी विक्रीचा गोरखधंदा कमालीचा फोफावला आहे.

दिवसाकाठी २ लाखांची उलाढाल : शुद्धीकरणाची खात्री नाहीमूर्तिजापूर: शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विक्री करण्याचा सपाटा शहरात सुरू आहे. खरेच पाणी शुद्ध केल्या जाते की नाही, याबाबत कोणीही खातरजमा करीत नसल्यामुळे पाणी विक्रीचा गोरखधंदा कमालीचा फोफावला आहे. या व्यवसायामध्ये दिवसाकाठी दीड ते दोन लाख रुपयांची उलाढाला होत असून, पाणी शुद्धीकरणाबाबत ग्राहकांनी आता आग्रही असण्याची गरज अधोरेखित होत आहे.सध्या प्रखर उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणीटंचाई तीव्र झाली आहे. त्यातच लग्न, मंगलकार्य व फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेऊन पिण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. त्यामुळे ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद, पाणी पाऊच विक्रीचा उद्योग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कमाईच्या हव्यासापोटी अनेक कंपन्या (लोकल) पाऊच अथवा बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ करताना दिसून येतात. मिनरल वॉटरचा वाढता खप लक्षात घेऊन अनेकांनी पाणी कॅन विक्रीचा धंदा उघडला आहे. केवळ पाणी थंड करून ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली पाणी विक्री केल्या जात आहे. ग्राहक घशाची कोरड घालविण्यासाठी केवळ थंड पाणी मिळते म्हणून पाणी विकत घेतात व तृष्णातृप्ती करतात; मात्र या पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गदा येण्याची शक्यता आहे. शहरात ८ ते १० विक्रेते असून, एक-दोन वगळले तर उर्वरित बोगस असल्याचे जाणकार सांगतात. त्यांच्याकडील पाण्याची तपासणी अद्यापही नसल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे अन्न औषधी प्रशासनाने याकडे लक्ष वेधून पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करण्याची मागणी जाणकार ग्राहकांनी केली आहे. 

पाऊच विक्री थंडावली!शहरात पाऊच २ रुपयांमध्ये विकत असताना कॅनमधील पाणी एक बिसलरी ५ रुपयात सर्रास विक्री होत आहे. थंड पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांचा ओढा कॅनकडे वाढला आहे. त्यामुळे पाऊच विक्रीला फटका बसत आहे.

अन्न-औषध विभाग निद्रिस्तबाटली व पाऊचमध्ये पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक आहे. तथापि, परवाना न काढताच काही जण पाणी विक्री करतात. नागरिकांच्या आरोग्याला धोका झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उरतो. त्यामुळे या विभागाने जागे होऊन पाणी विकणाऱ्यांचा परवाना तपासणे गरजेचे आहे.