शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापुरात ‘पाण्याचा’ पैसा!

By admin | Updated: April 18, 2017 20:18 IST

मूर्तिजापूर- शहरात अनेक ठिकाणी पाणी थंड करून विकण्याचा सपाटा व्यावसायिकांनी लावला आहे. शुद्धतेची खातरजमा केली जात नसल्याने पाणी विक्रीचा गोरखधंदा कमालीचा फोफावला आहे.

दिवसाकाठी २ लाखांची उलाढाल : शुद्धीकरणाची खात्री नाहीमूर्तिजापूर: शुद्ध पाण्याच्या नावाखाली केवळ पाणी थंड करून विक्री करण्याचा सपाटा शहरात सुरू आहे. खरेच पाणी शुद्ध केल्या जाते की नाही, याबाबत कोणीही खातरजमा करीत नसल्यामुळे पाणी विक्रीचा गोरखधंदा कमालीचा फोफावला आहे. या व्यवसायामध्ये दिवसाकाठी दीड ते दोन लाख रुपयांची उलाढाला होत असून, पाणी शुद्धीकरणाबाबत ग्राहकांनी आता आग्रही असण्याची गरज अधोरेखित होत आहे.सध्या प्रखर उन्हाळ्याचे दिवस आहेत. पाणीटंचाई तीव्र झाली आहे. त्यातच लग्न, मंगलकार्य व फिरण्याच्या निमित्ताने बाहेर पडले की पाणी विकत घेऊन पिण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. त्यामुळे ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या बाटलीबंद, पाणी पाऊच विक्रीचा उद्योग मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे कमाईच्या हव्यासापोटी अनेक कंपन्या (लोकल) पाऊच अथवा बाटलीवर निर्मितीची तारीख टाकण्यास टाळाटाळ करताना दिसून येतात. मिनरल वॉटरचा वाढता खप लक्षात घेऊन अनेकांनी पाणी कॅन विक्रीचा धंदा उघडला आहे. केवळ पाणी थंड करून ‘मिनरल वॉटर’च्या नावाखाली पाणी विक्री केल्या जात आहे. ग्राहक घशाची कोरड घालविण्यासाठी केवळ थंड पाणी मिळते म्हणून पाणी विकत घेतात व तृष्णातृप्ती करतात; मात्र या पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गदा येण्याची शक्यता आहे. शहरात ८ ते १० विक्रेते असून, एक-दोन वगळले तर उर्वरित बोगस असल्याचे जाणकार सांगतात. त्यांच्याकडील पाण्याची तपासणी अद्यापही नसल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे अन्न औषधी प्रशासनाने याकडे लक्ष वेधून पाण्याच्या शुद्धतेची तपासणी करण्याची मागणी जाणकार ग्राहकांनी केली आहे. 

पाऊच विक्री थंडावली!शहरात पाऊच २ रुपयांमध्ये विकत असताना कॅनमधील पाणी एक बिसलरी ५ रुपयात सर्रास विक्री होत आहे. थंड पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांचा ओढा कॅनकडे वाढला आहे. त्यामुळे पाऊच विक्रीला फटका बसत आहे.

अन्न-औषध विभाग निद्रिस्तबाटली व पाऊचमध्ये पाणी विकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना आवश्यक आहे. तथापि, परवाना न काढताच काही जण पाणी विक्री करतात. नागरिकांच्या आरोग्याला धोका झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न उरतो. त्यामुळे या विभागाने जागे होऊन पाणी विकणाऱ्यांचा परवाना तपासणे गरजेचे आहे.