शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीला गळती; चार लाखांच्या पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:18 IST

अकोटः वान धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीच्या गळतीवरून चार लाखांचे पाणीचोरी केल्याची तक्रार पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये ...

अकोटः वान धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी टाकलेल्या जलवाहिनीच्या गळतीवरून चार लाखांचे पाणीचोरी केल्याची तक्रार पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये शनिवार, दि. १५ मे रोजी दाखल केली.

पाणीपुरवठा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वान धरण-अकोट शहरादरम्यान, जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवरील जोडणी शेतमालक सुनील रामकृष्ण राऊत (रा. हिवरखेड) यांनी नादुरुस्त करून जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान केले. जलवाहिनीच्या जोडणीजवळ खड्डा करून पाणी स्वत:च्या विहिरीत घेत आहेत. शेतकरी वारंवार जोडणी निकामी करून भरपूर प्रमाणात शासनाचे पाणी चोरी करीत आहे. आतापर्यंत सदर शेतकऱ्याने चार लाख रुपयांचे पाणी चोरले असून, फौजदारी कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी जलवाहिनीमधून अवैध कनेक्शन घेण्यात आले आहेत. या अवैध कनेक्शनमुळे नियमित पाणी देयक भरणाऱ्या ग्राहकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो.