शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वऱ्हाडातील सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:29 IST

अकोला : गत चोवीस तासांत पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के अशी अल्पशी वाढ झाली आहे.

अकोला : गत चोवीस तासांत पश्चिम (वऱ्हाड) विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात २.५ टक्के अशी अल्पशी वाढ झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धासह अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा व वान धरणातही ही वाढ दिसून आल्याने पाणी वाढण्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.गेल्या २५ जुलैपासून वºहाडात पाऊस सुरू आहे. तथापि, पावसात जोर नसल्याने चिंता वाढली होती. ३० जुलै ते ३१ जुलै पहाटेपर्यंत चांगला पाऊस झाल्याने अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात एका दिवसात ०.२६ टक्के वाढ झाली, तर वान धरणात ४.६३ टक्के वाढ झाली आहे. काटेपूर्णा प्रकल्पात ३.५ टक्के जो साठा होता, तो आजमितीस ३.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. वान धरणात मंगळवारी ३२.२१ टक्के जलसाठा होता, आजमितीस हा साठा ३६.८४ टक्क्यांवर पोहोचला आहे. अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाचा जलसाठा १५.९३ वरू न १६.७९ टक्क्यांवर पोहोचला. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा प्रकल्पाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. या प्रकल्पात ३० जुलै रोजी ३०.९७ टक्के जलसाठा होता, तो आजमितीस ४५.३२ टक्क्यांवर पोहोचला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पात २२.५४ वरू न २३.९० टक्के वाढ झाली. नळगंगा प्रकल्पात ९.३६ वरू न ९.५८ टक्के वाढ झाली आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण मध्यम प्रकल्पात ४.७३ वरू न ५.१६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. इतरही सिंचन प्रकल्पात वाढ झाली आहे.

खडकपूर्णात शून्य टक्के साठा!वऱ्हाडात ९ मोठे, २४ मध्यम व ४६९ लघू प्रकल्प आहेत. ३० जुलै रोजी रात्री बºयापैकी पाऊस पडल्याने या सिंचन प्रकल्पामध्ये अल्पशी वाढ झाली असली तरी बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा, कोराडी, वाशिम जिल्ह्यातील सोनल, अकोला जिल्ह्यातील निर्गृणा व उमा प्रकल्पाचा जलसाठा शून्य टक्के आहे. इतर काही धरणांची पातळी अत्यल्प आहे.

 

- सिंचन प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ आशादायक चित्र असून, आता चांगला पाऊस आल्यास जलसाठ्यात पुन्हा वाढ होणार आहे. असे असले तरी आता उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन व बचत करणे गरजेचे आहे.अंकुर देसाई,अधीक्षक अभियंता,पाटबंधारे मंडळ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण