शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

अतिक्रमण हटाव माेहिमेवर पाणी; लघु व्यावसायिकांचे ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

शहरात फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकाेलेकर प्रचंड वैतागले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेला लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला ...

शहरात फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकाेलेकर प्रचंड वैतागले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेला लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला असून, यामुळे वाणिज्य संकुलांमधील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गांधी राेड, जैन मंदिर परिसर, माेहम्मद अली राेड, सिटी काेतवाली ते टिळक राेड, लाेखंडी पूल ते जयहिंद चाैक, खुले नाट्यगृह ते सांगलीवाला शाेरूम, काला चबुतरा मार्ग, इंदूर गल्ली आदी भागातून दुचाकी तर साेडाच पायी चालणे कठीण झाले आहे. सणासुदीच्या दिवसांत खरेदीसाठी नागरिकांची माेठी गर्दी हाेते. ही बाब लक्षात घेता शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेतील वर्दळीचे रस्ते माेकळे करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी अतिक्रमण हटाव माेहिमेला प्रारंभ केला. प्रशासनाच्या माेहिमेवर पाणी फेरण्याचे काम लघु व्यावसायिक, फेरीवाले करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे.

वाणिज्य संकुलांमध्ये लपवतात हातगाड्या!

मनपाने अतिक्रमण हटाव माेहिमेला प्रारंभ केला की रस्त्यालगत हातगाडीवर विविध साहित्याची विक्री करणारे लघु व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या गांधी चाैकातील तसेच सिटी काेतवाली मागच्या वाणिज्य संकुलाच्या तळघरात लपवून ठेवत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

मनपा काही वाकडे करू शकत नाही!

जठारपेठ चाैकातील भाजीविक्रेत्यांनी पर्यायी जागेची मागणी केली असता त्यांना मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ५च्या आवारात आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून १०७ गाळे बांधून देण्यात आले. याकडे पाठ फिरवित भाजी विक्रेत्यांनी अक्षरश: रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यांना हटकले असता महापालिका आमचे काहीही वाकडे करू शकत नसल्याचे छातीठाेकपणे सांगतात.