शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अतिक्रमण हटाव माेहिमेवर पाणी; लघु व्यावसायिकांचे ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:24 IST

शहरात फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकाेलेकर प्रचंड वैतागले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेला लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला ...

शहरात फाेफावलेल्या अतिक्रमणामुळे सर्वसामान्य अकाेलेकर प्रचंड वैतागले आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेला लघु व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला असून, यामुळे वाणिज्य संकुलांमधील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. गांधी राेड, जैन मंदिर परिसर, माेहम्मद अली राेड, सिटी काेतवाली ते टिळक राेड, लाेखंडी पूल ते जयहिंद चाैक, खुले नाट्यगृह ते सांगलीवाला शाेरूम, काला चबुतरा मार्ग, इंदूर गल्ली आदी भागातून दुचाकी तर साेडाच पायी चालणे कठीण झाले आहे. सणासुदीच्या दिवसांत खरेदीसाठी नागरिकांची माेठी गर्दी हाेते. ही बाब लक्षात घेता शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या बाजारपेठेतील वर्दळीचे रस्ते माेकळे करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मनपाच्या प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांनी अतिक्रमण हटाव माेहिमेला प्रारंभ केला. प्रशासनाच्या माेहिमेवर पाणी फेरण्याचे काम लघु व्यावसायिक, फेरीवाले करीत असल्याचे चित्र समाेर आले आहे.

वाणिज्य संकुलांमध्ये लपवतात हातगाड्या!

मनपाने अतिक्रमण हटाव माेहिमेला प्रारंभ केला की रस्त्यालगत हातगाडीवर विविध साहित्याची विक्री करणारे लघु व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या गांधी चाैकातील तसेच सिटी काेतवाली मागच्या वाणिज्य संकुलाच्या तळघरात लपवून ठेवत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

मनपा काही वाकडे करू शकत नाही!

जठारपेठ चाैकातील भाजीविक्रेत्यांनी पर्यायी जागेची मागणी केली असता त्यांना मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक ५च्या आवारात आमदार रणधीर सावरकर यांच्या निधीतून १०७ गाळे बांधून देण्यात आले. याकडे पाठ फिरवित भाजी विक्रेत्यांनी अक्षरश: रस्त्यावर ठाण मांडले आहे. त्यांना हटकले असता महापालिका आमचे काहीही वाकडे करू शकत नसल्याचे छातीठाेकपणे सांगतात.