शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

टायगर ग्रुपतर्फे पोलिसांना पाण्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ...

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पाण्याचे वाटप करण्यात आहे. यावेळी तालुका प्रमुख मनोज वानखडे, आदित्य भूईकर, हिमांशू खेडकर, कार्तिक धानोरकर, रंजीत भूईकर, लकी चव्हाण, गौरव कांबळे, निखिल कांबळे आदित्य वरघट, ऋषिकेश बन्सोड, सूरज कांबळे, हर्षल इंगळे, सौरभ खाडे आदी उपस्थित होते. (फोटो)

--------------------------------

वन्य प्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित

पातूर: गतवर्षी सरासरी पावसाळा झाल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. परिणामी, शेतकऱ्यांनी भुईमूग व तीळ पिकांची पेरणी केली; मात्र जंगली जनावरांचा त्रास वाढल्याने शेतकऱ्यांची रात्र शेतातच जात आहे. २४ तास पिकाची राखण करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. वन्य प्राण्यांचा वाढता संचार मारक ठरला आहे.

------------------------------

मोबाईलच्या अतिवापराने दृष्टिदोष

तेल्हारा: मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्जन होऊन दृष्टिदोषाच्या आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि शाळेतच दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरचे शिक्षण सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

-----------------------

निराधार, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा!

बार्शीटाकळी: जिल्ह्यातील निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा, अशी मागणी होत आहे. निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी विविध पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडला आहे.

-------------------

कचरा पेट्यांची व्यवस्था करावी

अकोट: येथील काही वाॅर्डामध्ये न.प.च्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेला वारंवार मागणी करूनही व्यवस्था करण्यात आली नाही.

-----------------------

ढगाळ हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला!

मूर्तिजापूर: गत अनेक दिवसांपासून नियमितपणे ढगाळ व दमट हवामान आहे. परिणामी फुलझाडे व फळबागांवर किडींचे व रोगराईचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता कीडनाशक फवारणी करून परसबाग सुरक्षित करीत आहे. अनेक दिवसांपासून या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.

----------------------------

शेतशिवारात पीक काढण्याची लगबग

बाळापूर: बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमूग पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी कामात व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे. मात्र, पिके काढण्याची अंतिम लगबग सुरू असली, तरी शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

--------------------------