शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
2
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
5
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
6
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
7
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
8
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
9
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
10
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
11
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
12
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
13
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
14
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
15
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
16
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
17
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
18
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
19
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
20
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

टायगर ग्रुपतर्फे पोलिसांना पाण्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ...

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पाण्याचे वाटप करण्यात आहे. यावेळी तालुका प्रमुख मनोज वानखडे, आदित्य भूईकर, हिमांशू खेडकर, कार्तिक धानोरकर, रंजीत भूईकर, लकी चव्हाण, गौरव कांबळे, निखिल कांबळे आदित्य वरघट, ऋषिकेश बन्सोड, सूरज कांबळे, हर्षल इंगळे, सौरभ खाडे आदी उपस्थित होते. (फोटो)

--------------------------------

वन्य प्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित

पातूर: गतवर्षी सरासरी पावसाळा झाल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. परिणामी, शेतकऱ्यांनी भुईमूग व तीळ पिकांची पेरणी केली; मात्र जंगली जनावरांचा त्रास वाढल्याने शेतकऱ्यांची रात्र शेतातच जात आहे. २४ तास पिकाची राखण करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. वन्य प्राण्यांचा वाढता संचार मारक ठरला आहे.

------------------------------

मोबाईलच्या अतिवापराने दृष्टिदोष

तेल्हारा: मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्जन होऊन दृष्टिदोषाच्या आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि शाळेतच दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरचे शिक्षण सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

-----------------------

निराधार, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा!

बार्शीटाकळी: जिल्ह्यातील निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा, अशी मागणी होत आहे. निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी विविध पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडला आहे.

-------------------

कचरा पेट्यांची व्यवस्था करावी

अकोट: येथील काही वाॅर्डामध्ये न.प.च्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेला वारंवार मागणी करूनही व्यवस्था करण्यात आली नाही.

-----------------------

ढगाळ हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला!

मूर्तिजापूर: गत अनेक दिवसांपासून नियमितपणे ढगाळ व दमट हवामान आहे. परिणामी फुलझाडे व फळबागांवर किडींचे व रोगराईचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता कीडनाशक फवारणी करून परसबाग सुरक्षित करीत आहे. अनेक दिवसांपासून या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.

----------------------------

शेतशिवारात पीक काढण्याची लगबग

बाळापूर: बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमूग पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी कामात व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे. मात्र, पिके काढण्याची अंतिम लगबग सुरू असली, तरी शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

--------------------------