शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

टायगर ग्रुपतर्फे पोलिसांना पाण्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ...

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पाण्याचे वाटप करण्यात आहे. यावेळी तालुका प्रमुख मनोज वानखडे, आदित्य भूईकर, हिमांशू खेडकर, कार्तिक धानोरकर, रंजीत भूईकर, लकी चव्हाण, गौरव कांबळे, निखिल कांबळे आदित्य वरघट, ऋषिकेश बन्सोड, सूरज कांबळे, हर्षल इंगळे, सौरभ खाडे आदी उपस्थित होते. (फोटो)

--------------------------------

वन्य प्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित

पातूर: गतवर्षी सरासरी पावसाळा झाल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. परिणामी, शेतकऱ्यांनी भुईमूग व तीळ पिकांची पेरणी केली; मात्र जंगली जनावरांचा त्रास वाढल्याने शेतकऱ्यांची रात्र शेतातच जात आहे. २४ तास पिकाची राखण करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. वन्य प्राण्यांचा वाढता संचार मारक ठरला आहे.

------------------------------

मोबाईलच्या अतिवापराने दृष्टिदोष

तेल्हारा: मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्जन होऊन दृष्टिदोषाच्या आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि शाळेतच दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरचे शिक्षण सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

-----------------------

निराधार, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा!

बार्शीटाकळी: जिल्ह्यातील निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा, अशी मागणी होत आहे. निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी विविध पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडला आहे.

-------------------

कचरा पेट्यांची व्यवस्था करावी

अकोट: येथील काही वाॅर्डामध्ये न.प.च्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेला वारंवार मागणी करूनही व्यवस्था करण्यात आली नाही.

-----------------------

ढगाळ हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला!

मूर्तिजापूर: गत अनेक दिवसांपासून नियमितपणे ढगाळ व दमट हवामान आहे. परिणामी फुलझाडे व फळबागांवर किडींचे व रोगराईचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता कीडनाशक फवारणी करून परसबाग सुरक्षित करीत आहे. अनेक दिवसांपासून या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.

----------------------------

शेतशिवारात पीक काढण्याची लगबग

बाळापूर: बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमूग पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी कामात व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे. मात्र, पिके काढण्याची अंतिम लगबग सुरू असली, तरी शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

--------------------------