शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

टायगर ग्रुपतर्फे पोलिसांना पाण्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:16 IST

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ...

कोरोना काळात जीव धोक्यात घालून रात्रंदिवस कर्तव्य बजावणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पाण्याचे वाटप करण्यात आहे. यावेळी तालुका प्रमुख मनोज वानखडे, आदित्य भूईकर, हिमांशू खेडकर, कार्तिक धानोरकर, रंजीत भूईकर, लकी चव्हाण, गौरव कांबळे, निखिल कांबळे आदित्य वरघट, ऋषिकेश बन्सोड, सूरज कांबळे, हर्षल इंगळे, सौरभ खाडे आदी उपस्थित होते. (फोटो)

--------------------------------

वन्य प्राण्यांमुळे शेतकरी असुरक्षित

पातूर: गतवर्षी सरासरी पावसाळा झाल्यामुळे प्रत्येकाच्या विहिरीतील पाण्याची पातळी वाढली. परिणामी, शेतकऱ्यांनी भुईमूग व तीळ पिकांची पेरणी केली; मात्र जंगली जनावरांचा त्रास वाढल्याने शेतकऱ्यांची रात्र शेतातच जात आहे. २४ तास पिकाची राखण करण्याशिवाय शेतकऱ्यांजवळ पर्याय उरलेला नाही. वन्य प्राण्यांचा वाढता संचार मारक ठरला आहे.

------------------------------

मोबाईलच्या अतिवापराने दृष्टिदोष

तेल्हारा: मोबाईलच्या अतिवापरामुळे किरणोत्सर्जन होऊन दृष्टिदोषाच्या आजाराने ग्रासले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षण बंद करावे आणि शाळेतच दोन मीटरच्या अंतराने विद्यार्थ्यांना बसवून फळ्यावरचे शिक्षण सुरू करावे, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

-----------------------

निराधार, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा!

बार्शीटाकळी: जिल्ह्यातील निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा, अशी मागणी होत आहे. निराधार आणि शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी विविध पक्षांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसह शेतकरी संकटात सापडला आहे.

-------------------

कचरा पेट्यांची व्यवस्था करावी

अकोट: येथील काही वाॅर्डामध्ये न.प.च्या वतीने कचरा पेट्या ठेवण्यात न आल्याने ठिकठिकाणी कचरा पसरलेला दिसतो. पावसामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे किड्यांचा प्रकोप वाढला असून, आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिकेला वारंवार मागणी करूनही व्यवस्था करण्यात आली नाही.

-----------------------

ढगाळ हवामानामुळे किडींचा प्रादुर्भाव वाढला!

मूर्तिजापूर: गत अनेक दिवसांपासून नियमितपणे ढगाळ व दमट हवामान आहे. परिणामी फुलझाडे व फळबागांवर किडींचे व रोगराईचे प्रमाण वाढत आहे. यावर नियंत्रण मिळविण्याकरिता कीडनाशक फवारणी करून परसबाग सुरक्षित करीत आहे. अनेक दिवसांपासून या बदलत्या वातावरणाचा परिणाम शेती पिकांवरही होत आहे. यामुळे अडचणीत वाढ झाली आहे.

----------------------------

शेतशिवारात पीक काढण्याची लगबग

बाळापूर: बाळापूर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमूग पिकाच्या काढणीस सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी कामात व्यस्त असल्याचे चित्र शेतशिवारात दिसून येत आहे. मात्र, पिके काढण्याची अंतिम लगबग सुरू असली, तरी शेतकऱ्यांना मजुरांच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

--------------------------