शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

अकोला शहरावर जलसंकट; महान धरणात अवघा नऊ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:01 IST

अकोला : महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे.

ठळक मुद्देशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील (काटेपूर्णा प्रकल्प) जलसाठ्यात घसरण झाली आहे.आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याची पुरेपूर जाणीव असतानादेखील नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजले नसल्याचे चित्र पहावयास मिळते. मनपा प्रशासनाने ‘जल’जागृतीसाठी शहरात फ्लेक्स, होर्डिंग उभारले असले, तरी नागरिकांनीच पाण्याचा जपून वापर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

- आशिष गावंडे

अकोला : अकोलेकरांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा होत असला, तरी पाण्याची किंमत समजत नसल्यामुळे की काय, हातात पाइप घेऊन रस्त्यांवर पाणी शिंपडणारे, चारचाकी, दुचाकी वाहने धुणाऱ्यांची संख्या कमी होण्याचे नावच घेत नसल्याचे चित्र आहे. महान धरणात आजरोजी अवघा नऊ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पाण्याचा जपून वापर करण्याची वेळ आली असताना पाण्याची होणारी नासाडी चिंतेचा विषय झाला आहे. ही बाब लक्षात घेता मनपा प्रशासनाने जनजागृतीसाठी पुढाकार घेतला असला, तरी शहरातील सामाजिक, स्वयंसेवी संघटनांनी ‘जल’जागृतीसाठी समोर येण्याची गरज निर्माण झाली आहे.गतवर्षी पावसाने हुलावणी दिल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान धरणातील (काटेपूर्णा प्रकल्प) जलसाठ्यात घसरण झाली आहे. पावसाळा संपण्याच्या मार्गावर असताना अखेरच्या काही दिवसांत आलेल्या पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात अवघ्या एक ते दीड टक्क्याने वाढ झाली. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करून शहरवासीयांना आठ दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. नळाला आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याची पुरेपूर जाणीव असतानादेखील नागरिकांना पाण्याचे महत्त्व समजले नसल्याचे चित्र पहावयास मिळते. पाणी पुरवठा करताना त्या-त्या भागातील पाइपलाइनवरील शेवटच्या नळ कनेक्शनधारकांना पाणी पुरवठा करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. पाइपलाइनवरील शेवटच्या नळ कनेक्शनधारकापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी लागणाºया कालावधीचा गैरफायदा घेत नागरिक पाण्याची नासाडी करीत असल्याचे चित्र सर्रासपणे दिसून येते. घरासमोरील रस्त्यावर पाणी शिंपडणे, चारचाकी, दुचाकी वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर केला जात आहे. धरणातील उपलब्ध जलसाठा पाहता मनपा प्रशासनाने ‘जल’जागृतीसाठी शहरात फ्लेक्स, होर्डिंग उभारले असले, तरी नागरिकांनीच पाण्याचा जपून वापर करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव!यंदा महान धरणात ठणठणाट होणार असल्याची परिस्थिती आहे. धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे जलसाठ्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाच्या मदतीने धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव तयार केला. सदर प्रस्ताव जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे सादर केल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola cityअकोला शहरKatepurna Damकाटेपूर्णा धरण