शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांवर जलसंकट : ५.९९ टक्के जलसाठा जुलैपर्यंत पुरणार कसा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:51 IST

अकोला: एप्रिलअखेर जिल्ह्यातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठ्यात मागील तीन आठवड्यांत २.५ टक्क्यांनी घट झाली.

ठळक मुद्दे आजमितीस या धरणात केवळ ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.धरणातील जिवंत जलसाठा जुलैपर्यंत पुरणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- राजरत्न सिरसाटअकोला: एप्रिलअखेर जिल्ह्यातील शेकडो गावात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, अकोला शहराची जीवनरेखा काटेपूर्णा धरणातील जिवंत जलसाठ्यात मागील तीन आठवड्यांत २.५ टक्क्यांनी घट झाली. आजमितीस या धरणात केवळ ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. या पाण्यात आठ लाख अकोलेकरांची तहान भागणार कशी, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. दुसरीकडे पाणी पुरवठ्याची कोणतीच सोय नसल्याने शहरातील नागरिकांनी मोर्चे, आंदोलनाला सुरुवात केली. महिलांनी तर लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानासमोर लोटांगण आंदोलन करू न पाणी प्रश्न सोडविण्यासाठी साकडे घातले.अकोला जिल्ह्यात काटेपूर्णा हे एकमेव मोठे धरण असून, या धरणाच्या पाण्यावर आठ लाख अकोलेकरांची तहान भागविली जाते; पण मागील वर्षी पूरक पाऊस न झाल्याने या धरणात अल्प जलसाठा संचयित झाला. परिणामी, यावर्षी पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले. धरणांतील जलसाठ्याची पातळी कमालीची खालावल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही ४३ ते ४४ अंशांपर्यंत पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असल्याने धरणातील जलसाठ्यात वेगाने घट होत आहे.दरम्यान,जानेवारी महिन्याच्या शेवटी काटेपूर्णा धरणात १२.८४ टक्के जलसाठा उपलब्ध होता. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यात मात्र हा जलसाठा १०.५८ टक्के खाली आला. म्हणजे १० ते १२ दिवसांत दोन टक्केपर्यंत घट झाली. मार्च महिन्याच्या सुरुवातीला या धरणात नऊ टक्के जलसाठा शिल्लक होता, तर एप्रिल महिन्याच्या १२ एप्रिल रोजी हा जलसाठा ७.३४ टक्केपर्यंत घटला. २४ एप्रिल रोजी मात्र या धरणात ५.९९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. म्हणजेच बारा दिवसांत या जलसाठ्यात २.३५ टक्के घट झाली. ही घट याच वेगाने सुरू राहिल्यास या धरणातील जिवंत जलसाठा जुलैपर्यंत पुरणे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- मृत जलसाठा ११ दलघमी!या धरणात ११ दशलक्ष घनमीटर मृत जलसाठा असल्याचे सांगण्यात येत असले, तरी अर्ध्यापेक्षा जास्त त्यामध्ये गाळ आहे. त्यामुळे गाळातील पाणी जुलै महिना भागवेल, याबाबतही साशंकता आहे.

- मृतसाठा उपसणार कसा?पाणीटंचाईची भीषणता वाढली असून, जिवंत जलसाठा काही दिवसांचा शिल्लक असताना मृत जलसाठा उपसण्यासाठीची कोणती तयारी प्रशासनाने केली, असा प्रश्न अकोलेकरांकडून उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :AkolaअकोलाKatepurna Damकाटेपूर्णा धरण