शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

वऱ्हाडावरील जलसंकट होणार गडद; प्रमुख धरणांमध्ये उरला फक्त ३९ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 18:45 IST

अकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.

ठळक मुद्देअकोल्यातील चित्र भीषण; काटेपूर्णा धरणात १६ टक्के जलसाठा.पूस २२.५, अरुणावतीमध्ये केवळ १६ टक्के ,सोनल प्रकल्पात ३.२५ टक्केच जलसाठा.

- राजरत्न सिरसाटअकोला : यावर्षी कमी पाऊस झाल्याने पश्चिम विदर्भातील (वºहाड) सर्व धरण मिळून केवळ ३९.७८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. एका महिन्यात या जलसाठ्यात दहा टक्के घट झाली. अकोलेकरांची लाइफ लाइन असलेल्या काटेपूर्णा धरणात तर १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यात अर्धा गाळ असल्याने अकोलेकरांवरील जलसंकट गडद झाले आहे.वºहाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पात आजमितीस ३९.७८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागच्या नोव्हेंबर महिन्यात हा जलसाठा ४९.९७ टक्के होता. १५ डिसेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात १६.४९ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.८५ टक्के, निर्गुणा ५९.९७, उमा धरणात केवळ ४.६२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९६.६२ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात ३८.३९ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी १२.८८ टक्के आहे. पेनटाक ळी धरणात ३२.९५ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ५२.२५, मसमध्ये १७.९५ टक्के, कोराडी १९.९७, पलढग ९७.६०, मन १७.२. तोरणा २२७.५० टक्के, तर उतावळी धरणात ३६.३३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २४.०० टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ३.२५ टक्के, तर एकबुर्जी धरणात २७.८२ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात २०.७४ टक्के, अरुणावतीमध्ये १४.६९, तर बेंबळा धरणात १८.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ९९.६७ टक्के एवढा बºयापैकी जलसाठा शिल्लक आहे.वऱ्हाडात नऊ मोठे प्रकल्पवऱ्हाडातील नऊ मोठ्या धरणात ४५.५६ टक्के जलसाठा आहे. २३ मध्यम प्रकल्पात ४३.१० टक्के, तर ४५२ लघू प्रकल्पात २९.१० टक्के जलसाठा शिल्लक आहे. या सर्व जलसाठ्यातील पाण्याची सरासरी टक्केवारी ही ३९.७८ टक्के आहे. यातील लघू प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही. त्यामुळे मोठे व मध्यम प्रकल्पातील पाणीच वापरले जाणार आहे. यातील बहुतांश धरणात अर्धा गाळ आहे.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणAkola Ruralअकोला ग्रामीण