शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

२0 जिल्ह्यांवर जलसंकट

By admin | Updated: March 2, 2016 02:38 IST

राज्यात दोन हजार पाणी टँकर, विदर्भात सामाधनकारक स्थिती; तर मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक टँकर.

नीलेश शहाकार/बुलडाणा पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद होत असून, विदर्भ, कोकण व खान्देश आदी भागाच्या तुलनेत राज्याच्या मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रात पाणी टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तसेच भूजल सर्वेक्षण विभाग यांनी २६ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अहवालानुसार, राज्यात २२९४ खासगी व शासकीय टँकरने णीपुरवठा केला जात असून, यात मराठवाड्यात १६४0 आणि पश्‍चिम भागात ४४५ टँकर आहेत. सद्यस्थितीत राज्यातील २0 जिल्ह्यांवर जलसंकट आहे.गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या अल्प पावसाने राज्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यात ३ हजार ७८४ गावे व वाड्या वस्त्यांवर राज्यभरात तब्बल २ हजार ९६ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. सद्यस्थितीत राज्यातील २0 जिल्ह्यांत पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. या जिल्ह्यातील अनेक गावांना टँकरचा आधार आहे. उर्वरित १४ जिल्ह्यांत फेब्रुवारीअखेर टँकर सुरू झाले नाहीत. पाणीटंचाई असलेले सर्वाधिक जिल्हे मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातील आहेत. गेल्या वर्षभर राज्यातील काही जिल्ह्यांत बाराही महिने टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे गतवर्षी २२ फेब्रुवारी २0१५ च्या अहवालानुसार, यंदा पाणीटंचाई जाणवत असलेल्या या जिल्ह्यांमध्ये पाणी टँकरची आवश्यकता भासली नव्हती.टँकरवरच भागविली जाते तहान!सर्वाधिक टँकर बीड जिल्ह्यात सुरू असून, २९६ गावे व २५२ वाड्या-वस्त्यांना ३९0 खासगी व शासकीय टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या पाठोपाठ औरंगाबाद ३३८ पाणी टँकर सुरू असून, नांदेड २४३, उस्मानाबाद २४१, अहमदनगर २0९, जालना १७0, लातूरला १६६ पाणी टँकरचा आधार आहे. तसेच सांगली ७८, नाशिक ५५, पुणे ५३, जळगाव १३, धुळे २, सातारा २५, सोलापूर १0, परभणी ८३, हिंगोली ९ या जिल्ह्यांसह विदर्भातील अमरावती जिल्ह्यात १, वाशिम २, बुलडाणा ७, यवतमाळ १, अशा एकूण २0 जिल्ह्यांतील नागरिकांची तहान टँकरच्या पाण्याद्वारे भागविली जात आहे.११ जिल्हे टँकरमुक्त!ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, नंदूरबार, कोल्हापूर, अकोला, नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या चौदा जिल्ह्यांत फेब्रुवारीअखेरपर्यंत टँकर सुरू झाले नसल्याची नोंद आहे.