शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

मोर्णा नदीवरील पुलावरून पाणी !

By admin | Updated: July 13, 2016 01:56 IST

शेकडो एकरातील पिके पाण्याखाली : तीन रस्त्यांवरील वाहतूक ठप्प.

हातरुण (अकोला) - बाळापूर तालुक्यातील हातरुण परिसरातील नदी, नाल्यांना जोरदार पावसामुळे पूर आला असून दुधाळा, शिंगोली,बादलापूर मार्ग बंद पडल्याने वाहतूक ठप्प पडली.कारंजा रमजानपूरजवळील पानकास नाल्याला पूर आल्याने हातरुण ते निंबा फाटा रस्त्यावरील वाहतूक ठप्प पडली. त्यामुळे प्रवाशांना निंबा येथे रात्र काढावी लागली. हातरुण ते धामणा मार्गावरील मोर्णा नदीच्या पुलावरून चार फूट पाणी वाहत असल्याने नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली. या पुरामुळे या मार्गावरील दुधाळा ,बोरगाव वैराळे गावांचा संपर्क तुटला आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने महसूल विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नुकतीच पेरणी केलेली शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेकडो शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुष्काळातून शेतकरी सावरलेला नसताना पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे.हातरुण ते बादलापूर या मार्गावरील तीन नाल्यांना पूर आल्याने या मार्गावरील अकोला जाणारी वाहतूक सोमवारच्या दुपारपासून ठप्प पडली आहे. पुराचे पाणी हातरुण गावनजीक असलेल्या जागेश्‍वर मंदिराजवळ आल्याने मंगळवारी तेथे भरणारा आठवडी बाजार गावातील मुख्य चौकात भरला होता. नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण महसूल विभागाने करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी केली आहे.