शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

बाळापुरात वीटभट्टयांसाठी पाण्याची सर्रास चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:21 IST

बाळापूर : पारस औष्णिक वीज केंद्रासाठी मन नदीवर बांधलेल्या  धरणातील पाण्याची  वीटभट्यांसाठी सर्रास चोरी करण्यात येत  असल्याचे ‘लोकमत’ने ९ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑ परेशनमध्ये उघड झाले आहे.  

ठळक मुद्देअनेक वीटभट्याही अवैध पारस वीज निर्मिती केंद्राच्या धरणापर्यंत जमिनीतून टाकले आहेत  पाइप

अनंत वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : पारस औष्णिक वीज केंद्रासाठी मन नदीवर बांधलेल्या  धरणातील पाण्याची  वीटभट्यांसाठी सर्रास चोरी करण्यात येत  असल्याचे ‘लोकमत’ने ९ नोव्हेंबर रोजी केलेल्या स्टिंग ऑ परेशनमध्ये उघड झाले आहे.   सध्या नदीकाठी असलेल्या  वीटभट्टय़ांसाठी सुरू आहे. विशेष म्हणजे अनेक  वीटभट्टी   मालक ांकाकडे धरणाच्या पाण्याचा उपसा करण्याची, मातीचे उ त्खनन करण्याची, वीज वापराची व प्रदूषण नियंत्रण मंडळाची  अशी कुठलाही परवानगी नसतना अनेक विटभट्टे चालवत आहे त.   यावर्षी पावसाळा अल्प झाल्याने नदीपात्र कोरडे पडत आहे.  पारस प्रकल्पासाठी राखीव धरणातील पाणीसाठय़ाचा नदीपात्रातून  वीटभट्टय़ांसाठी उपसा करण्यासाठी प्रकल्प अधिकार्‍यांची पाणी  वापराची पूर्वपरवानगी असणे गरजेचे आहे. वीटभट्टय़ांसाठी असा  विनापरवाना व अनिर्बंध पाणी उपसा असाच सुरू राहिला, तर  भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊन औष्णिक वीज केंद्र मात्र बंद  पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.पारस औष्णिक वीज केंद्रासाठी पाण्यासाठी मन नदीवर  बांधलेल्या धरणाचे पाणी मन, म्हैस, निगरुणा (भिकुंड) नद्याच्या  पात्रात पसरलेले आहे. मागील तीन वर्षांपासून या नद्यांच्या  काठावर असलेल्या भिकुंडखेड, सातरगाव, कोळासा, गाझीपूर,  बाभूळखेड, कासारखेड येथील वीटभट्टय़ावाले या पाण्याचा  कुठल्याही परवानगीविना बिनबोभाट वापर करीत आहेत. शे तकर्‍याला शेतीसाठी पाण्याची गरज असेल, तर त्याला  तहसीलदार, प्रकल्प अधिकारी यांच्या लेखी परवान्याशिवाय  वीज वितरण कंपनी वीज पुरवठा देत नाही. सिंचनासाठी परवाना  असल्याशिवाय कृ षी पंपासाठी वीज पुरवठा देत नाही. मग  वीटभट्टय़ांना तहसीलदार, प्रकल्प अधिकार्‍यांच्या  परवानगीशिवाय वीज पुरवठा कसा दिला जातो, असा प्रश्न उपस् िथत होत आहे. धरणाच्या नदीपात्रातील पाण्याचा किमान ५0 ते  १00 वीटभट्टी मालक अवैध उपसा करीत आहेत. यावर्षी अल्प  पाऊस पडल्याने धरणाची पाणी पातळी खालावली. नदीपात्र  कोरडे पडत आहे. अशा परिस्थितीत प्रकल्पात पाणी नसल्यास  प्रकल्प बंद पडण्याची शक्यता असताना प्रकल्प अधिकारी,  महसूल विभागाकडून मात्र पाणी वापरणार्‍याविरुद्ध कुठलीही  कारवाई नाही.विनापरवानगी पाण्यासोबत माती उत्खननही मोठय़ा  प्रमाणात सुरू आहे. मातीची कुठलीही परवानगी उपविभागीय  महसूल अधिकार्‍यांकडून देण्यात आली नाही. तसेच प्रदूषण  मंडळाकडूनही वीटभट्टी सुरू करण्याचा एकही प्रस्ताव नसल्याने  विनापरवानगीने माती, पाणी, वीज वापर करून परिसर प्रदूषित  करीत असताना मात्र कुठल्याही प्रशासनाने कारवाईचा बडगा  उगारलेला नाही. 

टॅग्स :Waterपाणी