शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!

By admin | Updated: March 2, 2016 02:35 IST

अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात १४.६४ टक्केच जलसाठा

अकोला: फेब्रुवारी अखेरीस पश्‍चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही आताच ३७ अंशाच्या वर पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्‍चिम विदर्भातील मध्यम व मोठय़ा धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने आतापासूनच महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात आजमितीस १४.६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात केवळ ५.८४ टक्के पाणी उपलब्ध आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा आहे, तर दगडपारवा धरण पूर्वीच शून्य टक्क्य़ावर आले आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात केवळ १२.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ज्ञानगंगा धरणात ३३.५९ टक्के, मस १४.७२ टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १५.७१ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणाची टक्केवारी जवळपास १0.६८ असून, लोअर पूस ५२.४४ टक्के, सायखेडा २४.१0 टक्के, गोकी २९.३१ टक्के, वाघाडी ३२.८२ टक्के आणि बोरगाव धरणात १२.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम व अमरावती जिल्ह्यातील धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे.

 काटेपूर्णात अल्प जलसाठा काटेपूर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा वापर जर काटेकोरपणे केला, तर जून-जुलैपर्यंंत हा जलसाठा वापरता येईल; परंतु यापुढे या शिल्लक असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावेच लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट केले. कोराडी, दगडपारवा शून्यावर अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणाची पातळी शून्य टक्के असून, इतर धरणांतील पातळी वेगाने घसरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रकल्प १00 टक्के भरले होते. त्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा १0 टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.