शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!

By admin | Updated: March 2, 2016 02:35 IST

अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात १४.६४ टक्केच जलसाठा

अकोला: फेब्रुवारी अखेरीस पश्‍चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही आताच ३७ अंशाच्या वर पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्‍चिम विदर्भातील मध्यम व मोठय़ा धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने आतापासूनच महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात आजमितीस १४.६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात केवळ ५.८४ टक्के पाणी उपलब्ध आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा आहे, तर दगडपारवा धरण पूर्वीच शून्य टक्क्य़ावर आले आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात केवळ १२.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ज्ञानगंगा धरणात ३३.५९ टक्के, मस १४.७२ टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १५.७१ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणाची टक्केवारी जवळपास १0.६८ असून, लोअर पूस ५२.४४ टक्के, सायखेडा २४.१0 टक्के, गोकी २९.३१ टक्के, वाघाडी ३२.८२ टक्के आणि बोरगाव धरणात १२.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम व अमरावती जिल्ह्यातील धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे.

 काटेपूर्णात अल्प जलसाठा काटेपूर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा वापर जर काटेकोरपणे केला, तर जून-जुलैपर्यंंत हा जलसाठा वापरता येईल; परंतु यापुढे या शिल्लक असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावेच लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट केले. कोराडी, दगडपारवा शून्यावर अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणाची पातळी शून्य टक्के असून, इतर धरणांतील पातळी वेगाने घसरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रकल्प १00 टक्के भरले होते. त्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा १0 टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.