शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!

By admin | Updated: March 2, 2016 02:35 IST

अकोल्याच्या काटेपूर्णा धरणात १४.६४ टक्केच जलसाठा

अकोला: फेब्रुवारी अखेरीस पश्‍चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गंभीर झाले आहे. उन्हाचा कडाकाही आताच ३७ अंशाच्या वर पोहोचल्याने पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत असून, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने यावर्षी पश्‍चिम विदर्भातील मध्यम व मोठय़ा धरणांतील जलपातळी घसरली आहे. भूजल पातळीत कमालीची घट झाल्याने बोअरवेल, हातपंप, विहिरींना पाणीच उपलब्ध नसल्याने आतापासूनच महिला-पुरुषांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांचे मोर्चे आंदोलनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात आजमितीस १४.६५ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक असून, मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात केवळ ५.८४ टक्के पाणी उपलब्ध आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा आहे, तर दगडपारवा धरण पूर्वीच शून्य टक्क्य़ावर आले आहे. अकोला, बुलडाणा, अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी उपलब्ध आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात केवळ १२.३१ टक्के जलसाठा शिल्लक असून, ज्ञानगंगा धरणात ३३.५९ टक्के, मस १४.७२ टक्के, कोराडी शून्य टक्के, पलढग १५.७१ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणाची टक्केवारी जवळपास १0.६८ असून, लोअर पूस ५२.४४ टक्के, सायखेडा २४.१0 टक्के, गोकी २९.३१ टक्के, वाघाडी ३२.८२ टक्के आणि बोरगाव धरणात १२.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम व अमरावती जिल्ह्यातील धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे.

 काटेपूर्णात अल्प जलसाठा काटेपूर्णा धरणात १४.६५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या पाण्याचा वापर जर काटेकोरपणे केला, तर जून-जुलैपर्यंंत हा जलसाठा वापरता येईल; परंतु यापुढे या शिल्लक असलेल्या पाण्याचे काटेकोर नियोजन करावेच लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय लोळे यांनी स्पष्ट केले. कोराडी, दगडपारवा शून्यावर अकोला जिल्ह्यातील दगडपारवा व बुलडाणा जिल्ह्यातील कोराडी धरणाची पातळी शून्य टक्के असून, इतर धरणांतील पातळी वेगाने घसरत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रकल्प १00 टक्के भरले होते. त्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा १0 टक्क्य़ांपर्यंत खाली आला आहे.