शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!

By admin | Updated: March 15, 2016 02:10 IST

काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. तापमानही ४0 अंशाच्या वर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन 0.९ मि.मी. वेगाने होत असून, पंधरा दिवसांत ५ ते २0 टक्के जलसाठय़ात घसरण झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा व बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात आठ दिवसांपूर्वी १७ टक्के जलसाठा होता. आजमितीस तो १३.४१ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात २0.३७ टक्के जलसाठा होता, तो आज १३.५१ टक्के शिल्लक असून, या धरणाच्या जलसाठय़ात ७ टक्के एवढी घसरण झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ९.९५ टक्के असलेला जलसाठा ३.७६ टक्के आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा होता; आज ११.५७ टक्के आहे. अकोला, बुलडाणा, वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी होते; आज ते ४७ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात केवळ १४.६७ टक्के जलसाठा होता, तो ११.३0 टक्के आहे. ज्ञानगंगा धरणात ३९.४0 टक्के जलसाठा होता तो ३0.६४ टक्के शिल्लक आहे. मसमध्ये १९.५२ टक्के असलेला जलसाठा आज ११.११ टक्के आहे. पलढग १५.७१ टक्के जलसाठा होता, तो आज ८.२६ टक्के शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्हय़ातील पूस धरणाची टक्केवारी जानेवारीअखेरीस जवळपास ३0.९0 टक्के होती ती आजमितीस १0 टक्के आहे. या धरणाची पातळी २0 टक्कय़ाने घसरली आहे. लोअर पूस ६८.७८ टक्के होते, ते ४८.१९ टक्कय़ावर आले आहे. सायखेडा ३६.१५ टक्के होते, ते १९.८६ टक्के आहे. गोकी ४६.५८ टक्के होते, ते २५.२४ टक्कय़ावर आले आहे. वाघाडी ५0.0८ टक्के होते, ते आजमितीस २९.४४ टक्कयावर आले आहे. बोरगाव धरणात जानेवारीअखेरीस ४१.७७ टक्के जलसाठा शिल्लक होता, तो आजमितीस ११.६४ टक्कय़ावर येऊन ठेपला आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी धरणात १.९0 दलघमी तर सोनल धरणात 0.९१ दलघमी साठा शिल्लक आहे.अमरावती जिल्हय़ातील उध्र्ववर्धा, शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन या धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे. जलसाठय़ात सर्वत्र घसरण मागीलवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने वर्‍हाडातील सर्वच जलसाठय़ात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी अकोला जिल्हय़ातील जवळपास धरणात पुरेपूर ५0 टक्केही जलसाठा संचयित झाला नाही, त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी बंद करण्यात आले आहे. तरीही धरणातील पाणी वेगाने घसरत आहे.