शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!

By admin | Updated: March 15, 2016 02:10 IST

काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. तापमानही ४0 अंशाच्या वर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन 0.९ मि.मी. वेगाने होत असून, पंधरा दिवसांत ५ ते २0 टक्के जलसाठय़ात घसरण झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा व बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात आठ दिवसांपूर्वी १७ टक्के जलसाठा होता. आजमितीस तो १३.४१ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात २0.३७ टक्के जलसाठा होता, तो आज १३.५१ टक्के शिल्लक असून, या धरणाच्या जलसाठय़ात ७ टक्के एवढी घसरण झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ९.९५ टक्के असलेला जलसाठा ३.७६ टक्के आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा होता; आज ११.५७ टक्के आहे. अकोला, बुलडाणा, वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी होते; आज ते ४७ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात केवळ १४.६७ टक्के जलसाठा होता, तो ११.३0 टक्के आहे. ज्ञानगंगा धरणात ३९.४0 टक्के जलसाठा होता तो ३0.६४ टक्के शिल्लक आहे. मसमध्ये १९.५२ टक्के असलेला जलसाठा आज ११.११ टक्के आहे. पलढग १५.७१ टक्के जलसाठा होता, तो आज ८.२६ टक्के शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्हय़ातील पूस धरणाची टक्केवारी जानेवारीअखेरीस जवळपास ३0.९0 टक्के होती ती आजमितीस १0 टक्के आहे. या धरणाची पातळी २0 टक्कय़ाने घसरली आहे. लोअर पूस ६८.७८ टक्के होते, ते ४८.१९ टक्कय़ावर आले आहे. सायखेडा ३६.१५ टक्के होते, ते १९.८६ टक्के आहे. गोकी ४६.५८ टक्के होते, ते २५.२४ टक्कय़ावर आले आहे. वाघाडी ५0.0८ टक्के होते, ते आजमितीस २९.४४ टक्कयावर आले आहे. बोरगाव धरणात जानेवारीअखेरीस ४१.७७ टक्के जलसाठा शिल्लक होता, तो आजमितीस ११.६४ टक्कय़ावर येऊन ठेपला आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी धरणात १.९0 दलघमी तर सोनल धरणात 0.९१ दलघमी साठा शिल्लक आहे.अमरावती जिल्हय़ातील उध्र्ववर्धा, शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन या धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे. जलसाठय़ात सर्वत्र घसरण मागीलवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने वर्‍हाडातील सर्वच जलसाठय़ात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी अकोला जिल्हय़ातील जवळपास धरणात पुरेपूर ५0 टक्केही जलसाठा संचयित झाला नाही, त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी बंद करण्यात आले आहे. तरीही धरणातील पाणी वेगाने घसरत आहे.