शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

व-हाडातील जलसाठय़ात वेगाने घसरण!

By admin | Updated: March 15, 2016 02:10 IST

काटेपूर्णा प्रकल्पात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक.

अकोला: पश्‍चिम विदर्भातील शेकडो गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, धरणांमधील जलसाठय़ाची पातळी वेगाने घसरत असल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे. तापमानही ४0 अंशाच्या वर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन 0.९ मि.मी. वेगाने होत असून, पंधरा दिवसांत ५ ते २0 टक्के जलसाठय़ात घसरण झाली आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात केवळ १३.४१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अकोला जिल्हय़ातील दगडपारवा व बुलडाणा जिल्हय़ातील कोराडी धरणातील जलसाठा शून्य टक्के आहे.अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या काटेपूर्णा धरणात आठ दिवसांपूर्वी १७ टक्के जलसाठा होता. आजमितीस तो १३.४१ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. मोर्णा धरणात २0.३७ टक्के जलसाठा होता, तो आज १३.५१ टक्के शिल्लक असून, या धरणाच्या जलसाठय़ात ७ टक्के एवढी घसरण झाली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील उमा धरणात ९.९५ टक्के असलेला जलसाठा ३.७६ टक्के आहे. निगरुणा धरणात १७.२९ टक्के जलसाठा होता; आज ११.५७ टक्के आहे. अकोला, बुलडाणा, वान धरणात मात्र ५१.७२ टक्के पाणी होते; आज ते ४७ टक्के आहे. बुलडाणा जिल्हय़ातील नळगंगा धरणात केवळ १४.६७ टक्के जलसाठा होता, तो ११.३0 टक्के आहे. ज्ञानगंगा धरणात ३९.४0 टक्के जलसाठा होता तो ३0.६४ टक्के शिल्लक आहे. मसमध्ये १९.५२ टक्के असलेला जलसाठा आज ११.११ टक्के आहे. पलढग १५.७१ टक्के जलसाठा होता, तो आज ८.२६ टक्के शिल्लक आहे. तर यवतमाळ जिल्हय़ातील पूस धरणाची टक्केवारी जानेवारीअखेरीस जवळपास ३0.९0 टक्के होती ती आजमितीस १0 टक्के आहे. या धरणाची पातळी २0 टक्कय़ाने घसरली आहे. लोअर पूस ६८.७८ टक्के होते, ते ४८.१९ टक्कय़ावर आले आहे. सायखेडा ३६.१५ टक्के होते, ते १९.८६ टक्के आहे. गोकी ४६.५८ टक्के होते, ते २५.२४ टक्कय़ावर आले आहे. वाघाडी ५0.0८ टक्के होते, ते आजमितीस २९.४४ टक्कयावर आले आहे. बोरगाव धरणात जानेवारीअखेरीस ४१.७७ टक्के जलसाठा शिल्लक होता, तो आजमितीस ११.६४ टक्कय़ावर येऊन ठेपला आहे. वाशिम जिल्हय़ातील एकबुर्जी धरणात १.९0 दलघमी तर सोनल धरणात 0.९१ दलघमी साठा शिल्लक आहे.अमरावती जिल्हय़ातील उध्र्ववर्धा, शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन या धरणांची स्थिती याचप्रमाणे आहे. जलसाठय़ात सर्वत्र घसरण मागीलवर्षी पावसाने पाठ फिरविल्याने वर्‍हाडातील सर्वच जलसाठय़ात अपेक्षित वाढ झाली नाही. परिणामी अकोला जिल्हय़ातील जवळपास धरणात पुरेपूर ५0 टक्केही जलसाठा संचयित झाला नाही, त्यामुळे यावर्षी सिंचनाला पाणी बंद करण्यात आले आहे. तरीही धरणातील पाणी वेगाने घसरत आहे.