शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

बियाणे, खतांच्या काळाबाजारावर भरारी पथकांचा ‘वाॅच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST

खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे आणि बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांच्या विक्रीत ...

खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे आणि बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी कृषी निविष्ठांचा काळाबाजार होऊ नये, यादृष्टीने लक्ष ठेवण्याकरिता कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात १२ एप्रिलपर्यंत जिल्हास्तर आणि तालुकास्तरीय भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारींची तपासणीदेखील या भरारी पथकांकडून केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

नियंत्रण कक्षही स्थापन !

कृषी निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी तसेच तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याकरिता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयांमध्ये आणि तालुकास्तरांवर तालुका कृषी अधिकारी व पंचायत समित्यांच्या कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी कृषी निविष्ठांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच तक्रारींची तपासणी करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. यासोबतच जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

शंकर तोटावार

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.