शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

बियाणे, खतांच्या काळाबाजारावर भरारी पथकांचा ‘वाॅच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:19 IST

खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे आणि बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांच्या विक्रीत ...

खरीप हंगामात पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते मागणीप्रमाणे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे आणि बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, यासाठी कृषी निविष्ठांचा काळाबाजार होऊ नये, यादृष्टीने लक्ष ठेवण्याकरिता कृषी विभागामार्फत अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात १२ एप्रिलपर्यंत जिल्हास्तर आणि तालुकास्तरीय भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके आदी कृषी निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारींची तपासणीदेखील या भरारी पथकांकडून केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात कृषी विकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात जिल्हास्तरीय भरारी पथके आणि प्रत्येक तालुक्यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.

नियंत्रण कक्षही स्थापन !

कृषी निविष्ठांसंदर्भात शेतकऱ्यांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी तसेच तपासणी करून योग्य ती कार्यवाही करण्याकरिता अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले. जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कार्यालयांमध्ये आणि तालुकास्तरांवर तालुका कृषी अधिकारी व पंचायत समित्यांच्या कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या विक्रीत शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, यासाठी कृषी निविष्ठांच्या विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच तक्रारींची तपासणी करण्यासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. यासोबतच जिल्हा व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

शंकर तोटावार

विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती विभाग.