शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

वाशिम जिल्हाधिका-यांनी रोखले बीडीओ व अभियंत्यांचे वेतन

By admin | Updated: December 9, 2015 02:50 IST

धडक सिंचन कार्यक्रमातील १५00 विहिरी अर्धवट; वारंवार सूचना देऊनही सुधारणा नाही.

संतोष वानखडे / वाशिम:धडक सिंचन कार्यक्रमांतर्गतच्या विहीर बांधकामाकडे दुर्लक्ष करणार्‍या गटविकास अधिकारी व अभियंत्यांचे वेतन रोखण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी २0 नोव्हेंबर काढल्याने आणि डिसेंबरचे वेतन न निघाल्याने, प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली. वारंवार आढावा घेऊनही १५0५ अर्धवट विहिरी ह्यजैसे थेह्ण असल्याच्या अहवालावरून सदर आदेश काढल्याचे बोलले जात आहे.शेती परवडत नसल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. पारंपरिक शेतीला सिंचनाची जोड देऊन भरघोस उत्पादन काढण्याच्या उद्देशातून धडक सिंचन कार्यक्रम राज्य शासनाने अमलात आणला. धडक सिंचन कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात सन २00९-१0 मध्ये एकूण ७८00 विहिरींचे उद्दिष्ट मिळाले होते. आतापर्यंंत ५२२६ विहिरी पूर्ण केल्या असून, उर्वरित २५७४ विहिरी अपूर्ण असल्याचे आढावा बैठकीतून निदर्शनात आले. अपूर्ण विहिरींपैकी धडक सिंचन कार्यक्रमातून रोजगार हमी योजनेत (नरेगा) वर्ग केलेल्या १२६0 विहिरी व अनुदानात वाढ केलेल्या २४५ विहिरी पूर्ण करावयाच्या आहेत, तसेच १0६९ रद्द करावयाच्या विहिरींपैकी २६५ विहिरी पुनर्जीवित करणे प्रस्तावित आहे. गत चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यात नरेगामध्ये १२६0 व अनुदानात वाढ झालेल्या २४५ अशा एकूण १५0५ विहिर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याधिकारी राहुल द्विवेदी यांनी सर्व यंत्रणांना वारंवार दिले होते; मात्र चार महिन्यानंतरही परिस्थिती ह्यजैसे थेह्ण असल्याचे निदर्शनात आले, तसेच विहिरींची कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महिनानिहाय नियोजन सादर करण्याचे सुचवूनही अद्याप सदर नियोजन संबंधितांनी सादर केले नाही. रद्द विहिरींपैकी पुनर्जीवित करावयाच्या विहिरींचे लाभार्थीनिहाय माहिती सादर झाली नाही. विहिरींच्या प्रगतीबाबतचा अहवाल नियमित येत नसल्याने वरिष्ठांकडे माहिती सादर करण्यास अडचणी येतात. या सर्व दिरंगाईला जबाबदार असणार्‍या जिल्ह्यातील सहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, लघु सिंचन व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदींना कामगिरीत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या; मात्र सुधारणा झाली नसल्याने वेतन रोखण्याची कारवाई करण्यात आली.