शहरं
Join us  
Trending Stories
1
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला पोहोचले
2
श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट; रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला, लगेचच भारतात आणले जाणार?
3
Satyacha Morcha: राज ठाकरे लोकल ट्रेनमधून पोहोचले, तिकीटावर ऑटोग्राफ दिला; 'सत्याचा मोर्चा'ला अद्याप पोलिसांची परवानगी नाही
4
“प्रत्येक संकटाच्या डोळ्यात डोळे घालून तू लढतोस, जिंकतोस”; आदित्य ठाकरेंची राऊतांसाठी पोस्ट
5
IND vs SA World Cup Final: दक्षिण आफ्रिकेचा पुरुष संघ 'चोकर्स', महिलांचा संघ कसा? भारतासोबत ३४ सामने झाले, त्यापैकी...
6
ट्रेन तिकीट बुकिंगचे नियम बदलले, या लोकांना मिळणार लोअर बर्थ; झोपण्याची वेळही ठरली!
7
Social Viral: उत्तराखंडच्या 'या' सरोवरात पाणी नाही, तर आहेत फक्त सांगाडे; काय आहे गूढ?
8
एकीकडे पाकिस्तानसोबत युद्धविराम, मात्र दुसरीकडे अफगाणिस्तानने दिला मोठा इशारा! काय आहे प्रकरण?
9
UPI New Rules: ३ नोव्हेंबरपासून युपीआय पेमेंटमध्ये होणार मोठा बदल! पटापट करा चेक
10
"मी दोन दिवसांपूर्वीच रोहित आर्याला भेटलेलो...", मराठी अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "त्याच्यावर शंका आली नाही कारण..."
11
Tarot Card: नवा उत्साह, चैतन्य आणि आशादायी चित्र घेऊन येणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
12
ग्रहण योग-अशुभ पंचकात कार्तिकी एकादशी: १० राशींचा भाग्योदय-भरघोस भरभराट; विठुराया शुभ करेल!
13
भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप
14
IND vs SA World Cup Final: भारत-दक्षिण आफ्रिका अंतिम सामना पावसात रद्द झाल्यास काय? २००२ मध्ये भारतासोबत काय झालेले...
15
Shocking!! कॅप्टन बनताच Bigg Boss 19च्या घरातून बेघर झाला प्रणित मोरे? एलिमिनेशनमध्ये मोठा ट्विस्ट
16
Wife च्या नावे पोस्टाच्या या स्कीममध्ये ₹८०००, ५ वर्षांत होईल धनवर्षाव; पाहा कमाईचं संपूर्ण गणित
17
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२५: अचानक धनलाभ, प्रिय व्यक्तींचा सहवास; मन प्रसन्न राहील
18
“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे
19
LPG Cylinder Price Cut:आजपासून गॅस सिलिंडरची किंमत झाली कमी, पाहा तुमच्या शहरात काय आहेत नवे दर?
20
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश

वारीच्या धरणातून २० वर्षांपासून गाळाचा उपसाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 15:03 IST

दरवर्षी शंभर टक्के साठा असलेल्या या धरणातील गाळ गेल्या २० वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे.

- सत्यशील सावरकर लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : वारी हनुमान सागर धरण हे तालुक्यासह इतरही जिल्ह्यासाठी जलसंजीवनी देणारा प्रकल्प आहे. दरवर्षी शंभर टक्के साठा असलेल्या या धरणातील गाळ गेल्या २० वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे. गाळ न काढल्याने परिसरातील भूजल पातळी वाढली नाही.वारी हनुमान सागर प्रकल्प तालुक्यातील जनतेला सिंचनासाठी मोठा आधार असलेला प्रकल्प आहे. या पाण्यावर सिंचन करून लाभक्षेत्रातील शेतकरी खरिप व रब्बीत चांगले पिके घेतात. या प्रकल्पातील पाण्यावर विद्युत प्रकल्पसुद्धा चालतो, त्यामुळे परिसरातील जनतेच्या नजरा या धरणातील जलसाठ्याकडे असतात. उन्हाळ्यात सर्वत्र भीषण दुष्काळ पडला आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. बहुतांश बोअरवेल कोरडे पडले आहेत. बागायती शेती कोरडवाहू होत आहे. एकूणच परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे असताना वारी येथील हनुमान सागर प्रकल्प हा दोन जिल्ह्यातील लाखो लोकांची तहान भागवित आहे. सोबतच हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली असते, त्यामुळे या धरणातील जलसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते; परंतु या ठिकाणी भूजल पातळीत सुरुवातीला वाढ दिसली. त्यानंतर परिसरातील भूजल पातळीत वाढ दिसत नसल्याचे दिसत आहे. जेथे मोठे धरण आहे, त्या परिसरात भूजल पातळी चांगली राहते; परंतु वान प्रकल्प वीस वर्षांपासून कार्यरत असून, या परिसरात भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी सतत खालावत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गत वीस वर्षात धरणातून गाळ काढला नसल्याने पाणी मुरण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने भूजल पातळीत वाढ होताना दिसत नाही. परिणामी, परिसरात बागायती शेती कमी होत आहे. एकीकडे धरणातील गाळ काढण्यासाठी गाळमुक्त धरण, ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाची असली तरी हनुमान सागर प्रकल्पातील गाळ काढण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे.हनुमान सागर प्रकल्पाचा जलाशय परिसर हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने व गाळ काढण्याकरिता वन विभागाच्या परवानगीची गरज आहे. मागील वर्षी वान प्रकल्प अभियंत्यांनी त्याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपवन संरक्षकांकडे धरणातील गाळ काढण्याबाबत लेखी पत्राद्वारे परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पत्राला कोणतेच उत्तर दिले नसल्याचे समजते आणि अजूनपर्यंत परवानगीही दिली नसल्याचे समजते. याबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी होत आहे.

वान प्रकल्पाच्या सभोवताली व्याघ्र प्रकल्पाची वन जमीन असल्यामुळे या कार्यालयामार्फत आम्ही सुजलाम सुफलाम योजने अंतर्गत वन विभागाला गाळ काढण्याबाबत परवानगी मागितली होती, ती अद्याप मिळालेली नाही.अ. प्र. गुल्हाने,सहायक अभियंता श्रेणी-१वान प्रकल्प, तेल्हारा.

भूजल पातळी खालावत असतानाही शासनाची गाळमुक्त धरण योजना कागदावरच आहे. वीस वर्षांपासून प्रलंबित हनुमान सागर प्रकल्पातील गाळ तत्काळ काढण्यात यावा.- संतोष बजाज

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराWan Projectवान प्रकल्प