शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

गोदाम दुरूस्तीसाठी निधीची प्रतीक्षा

By admin | Updated: March 9, 2016 02:04 IST

अमरावती विभागातील गोदामांची दुरवस्था.

वाशिम : भारतीय अन्न महामंडळाकडून प्राप्त होणार्‍या अन्नधान्याची साठवणूक राज्य शासनाच्या गोदामांमध्ये केली जाते. त्याअनुषंगाने अमरावती विभागातील काही गोदामांची दुरूस्ती करण्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत; मात्र या प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. दुसरीकडे राज्यातील सहा गोदामांच्या दुरूस्तीसाठी ६९ लाख ५९ हजाराचा निधी मंजूर झाला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत राज्यातील शिधापत्रिकाधारकांना जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले जाते. अन्नधान्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी भारतीय अन्न महामंडळावर असून, या अन्नधान्याची साठवणूक राज्य शासनाच्या गोदामांमध्ये केली जाते. तालुक्याच्या ठिकाणी या गोदामांची व्यवस्था असून, येथूनच स्वस्त धान्य दुकानांमध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. अमरावती विभागातील जवळपास आठ शासकीय गोदामे जुनी झाली असून, येथे संरक्षक भिंत, रोलींग शटर बदलणे, गेट बसविणे, छताचे पत्रे बदलणे, खिडक्यांना तावदान लावणे, लोखंडी शटरचे दरवाजे बसविणे, व्हेंटिलेटरचा पत्रा बसविणे, क्राँक्रिट फ्लोअर तयार करणे आदींसाठी निधीची गरज आहे. या गोदामांच्या दुरूस्तीसाठी निधी मिळावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. या प्रस्तावांना हिरवी झेंडी मिळाली, तर शासकीय गोदामांची दुरूस्ती होऊ शकते. दुसरीकडे राज्यातील सहा गोदामांच्या दुरूस्तीसाठी राज्य शासनाने ६९ लाख ५९ हजार ७१३ रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद व देगलूर, लातूर जिल्ह्यातील शिरूर, नागपूर जिल्ह्यातील रामटेक व भंडारा जिल्ह्यातील लाखणी अशा सहा गोदामांच्या दुरूस्तीचा समावेश आहे. मंजूर निधीमधून या गोदामांची दुरूस्ती होणार आहे. गोदाम इमारतीचे प्लास्टर करणे, फरशी बदलणे, रोलिंग शटर बदलणे, संरक्षक भिंत बांधणे, गेट बसविणे, छताचे पत्रे बदलणे, खिडक्यांना तावदाने लावणे यासह आवश्यक ती दुरूस्ती केली जाणार आहे. अमरावती विभागातील एकाही गोदामांच्या दुरूस्तीसाठी निधी मंजूर झाला नसल्याने या गोदामांच्या दुरूस्तीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.