शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन विहिरींच्या लाभार्थींना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:15 IST

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देऊन समस्या निकाली काढण्याऐवजी त्या कायम ठेवण्याचा प्रकारही घडत असल्याचे चित्र आहे.

अकोला : आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यांमध्ये धडक सिंचन विहिरी निर्मितीची योजना गेल्या आठ वर्षांपासून रडत-खडत सुरू आहे. विशेष म्हणजे, त्यामध्ये सातत्याने बदल केल्यानंतरही शेकडो लाभार्थी अद्यापही वंचितच आहेत. त्यामुळे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये विशेष लक्ष देऊन समस्या निकाली काढण्याऐवजी त्या कायम ठेवण्याचा प्रकारही घडत असल्याचे चित्र आहे.अमरावती विभागातील पाच तसेच लगतच्या वर्धा जिल्ह्यातील मिळून ६६ तालुक्यांत ६६ हजार सिंचन विहिरींची धडक योजना २००९ मध्ये सुरू करण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून गावांमध्ये लक्ष्यांकानुसार शेतकऱ्यांना विहिरी मंजूर झाल्या. २०११ मध्ये पालकमंत्र्यांच्या समितीने शेतकºयांची निवड यादी प्रसिद्ध केली. त्यावेळी ६३०० पर्यंत शेतकºयांची निवड करण्यात आली; मात्र सुरुवातीलाच विहिरींसाठीचा निधी १ लाख रुपये असल्याने त्यातून विहिरींची निर्मिती करणे अशक्य असल्याने लाभार्थींनी विहिरींची कामेच सुरू केली नाहीत. निधीत वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात आली. त्यानंतर २०१४ मध्ये विहिरींसाठी निधीत २ लाख ५० हजार रुपये वाढ करण्यात आली. त्याचवेळी ज्या शेतकºयांनी अग्रिम घेऊन काम सुरू केले, त्यांनाच वाढीव निधी देण्याची अट टाकण्यात आली. त्यामुळे अत्यल्प प्रमाणात कामे सुरू केलेल्या शेतकºयांनाच त्याचा लाभ मिळाला. त्यानंतर शासनाने धोरणात बदल करत २०११ मध्ये निवड झालेल्या सर्वच शेतकºयांना विहिरी निर्मितीची संधी देण्यात आली. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाºयांनी प्रत्येक शेतकºयांची भेट घेत त्यांच्याकडून विहिरींचे काम सुरू करण्यास तयार असल्याचे हमीपत्र घेण्यात आले. त्यावेळी जिल्ह्यातील ६४४ पेक्षाही अधिक शेतकºयांनी विहिरींचे काम सुरू करण्याचे पत्र लिहून दिले. त्यावेळी अकोला, तेल्हारा तालुके वगळता इतर पाच तालुक्यातील शेतकºयांना विहिरी पुनर्जीवित करण्याला मंजुरी देण्यात आली. त्यापैकी काही विहिरींना सुरुवातही झाली, तर अनेकांनी सुरू करण्याचे हमीपत्र दिल्यानंतरही त्यांच्या विहिरी मंजूर झालेल्या नाहीत. त्यातील आता ६६ विहिरींना मंजुरी देण्यात आली. हा प्रकार २०११ मध्ये निवड झालेल्या शेकडो विहीर लाभार्थींवर अन्यायकारक असल्याने हमीपत्र दिलेल्या सर्वच लाभार्थींच्या विहिरींना मंजुरी देण्याची मागणी आता होत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना