वीरेंद्रसिंह राजपूत / टाकरखेड (जि. बुलडाणा) : हैद्राबाद येथील राष्ट्रीय जलविकास प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्यात वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पाचा ह्यप्री-फिजिबिलिटीह्ण रिपोर्ट तयार केला असून, या अहवालानुसार गोदावरी खोर्यातील प्राणहिता उपखोर्यामध्ये असलेल्या वैनगंगा नदीमधून महाराष्ट्राच्या वाट्याचे वाया जाणारे पाणी तापी खोर्याच्या पूर्णा उपखोर्यापर्यंंंत वळते करण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे भंडारा, नागपूर, वर्धा व अमरावती प्रादेशिक विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांना सिंचन व बिगर सिंचन वापराकरिता पाणी उपलब्ध होणार आहे. वैनगंगा नदीवर असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पास्थळी २७२१ दलघमी पाणी अखर्चित/अनियोजित असून, खोर्याअंतर्गत नियोजनास वाव नसल्यामुळे हे पाणी राज्याबाहेर वाहून जाते. प्रत्यक्षात अद्ययावत जलनियोजनानुसार मात्र गोसेखुर्द प्रकल्पस्थळी महाराष्ट्राच्या वाट्याचे १९१0 दलघमी पाणी अनियोजित आढळते. सदरचे अतिरिक्त पाणी सुमारे ५७८ कि.मी. लांबीच्या पुरवठा कालव्याव्दारे बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीवरील धरणामध्ये वळते मार्गामध्ये नवीन साठे निर्माण करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणस्थळी पुर्णसंचय पातळी २४३.00 मीटर असून वर नमुद केल्याप्रमाणे पावसाळ्याचे वाहून जाणारे सुमारे १९१0 दलघमी पाणी वळविण्याकरीता गोसी खुर्द धरणाच्या उजव्या बाजुस तीरावरून वळण कालवा प्रस्तावित करण्यात आला आहे. या कालव्याची नळगंगा धरणापर्यंंत एकुण लांबी ४७८.२0 किमी असून 0 ते १९४ किमी कालवा नागपूर विभागातून जातो तर उर्वरीत २८४.२0 किमी कालवा अमरावती प्रादेशिक विभागातून जातो. या वळण कालव्यामध्ये तीन टप्प्यात एकुण ८0 मीटर उपसा लिफ्ट प्रस्तावित आहे. यापैकी दोन उपसा (२६ किमी वर, ४0 मीटर, ४७ कि.मी. वर २0 मीटर) नागपूर प्रादेशिक विभागामध्ये प्रस्तावित असून एक उपसा (२९३.५0 किमीवर २0 मीटर) अमरावती प्रादेशिक विभागामध्ये प्रस्तावित आहे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पामुळे होईल जलक्रांती!
By admin | Updated: July 15, 2015 00:54 IST