शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

‘व्हायरल’चा विळखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 19:48 IST

वातावरणात झपाट्याने होणारे बदल,  दिवसा कडक ऊन व रात्रीचा गारवा, डासांचा  वाढलेला प्रादुर्भाव व दूषित पाणी या सर्व घटकांचा  एकत्रित परिणाम म्हणून जिल्हय़ाला ‘व्हायरल  फिव्हर’चा विळखा पडला आहे. तीव्र ताप, सर्दी- खोकला या विषाणूजन्य आजारासह, दूषित पाण्या पासून होणार्‍या आजारांचे रुग्ण घराघरांमध्ये दिसत  आहेत. अशातच डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या  आजाराचे रुग्ण वाढल्याने संपूर्ण जिल्हाच तापाने  फणफणल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देघराघरांत तापाचे रुग्ण ‘सवरेपचार’सह खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वातावरणात झपाट्याने होणारे बदल,  दिवसा कडक ऊन व रात्रीचा गारवा, डासांचा  वाढलेला प्रादुर्भाव व दूषित पाणी या सर्व घटकांचा  एकत्रित परिणाम म्हणून जिल्हय़ाला ‘व्हायरल  फिव्हर’चा विळखा पडला आहे. तीव्र ताप, सर्दी- खोकला या विषाणूजन्य आजारासह, दूषित पाण्या पासून होणार्‍या आजारांचे रुग्ण घराघरांमध्ये दिसत  आहेत. अशातच डेंग्यूसदृश लक्षणे असलेल्या  आजाराचे रुग्ण वाढल्याने संपूर्ण जिल्हाच तापाने  फणफणल्याचे चित्र आहे. पावसाळय़ाचे दिवस असतानाही दुपारी तापणारे ऊन  आणि सकाळ व सायंकाळी खेळणारी थंड हवा,  अशा टोकाच्या वातावरणाचा अनुभव येत  असल्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले असून, सवरे पचार रुग्णालयासह लहान-मोठय़ा दवाखान्यांमध्ये  रुग्णांची संख्या वाढली आहे. पावसामुळे शहरातील  बहुतांश भागात डबके साचले आहे, त्यामुळे डासांचे  प्रमाण वाढले आहे. वातावरणातील या बदलाचा  परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर थेट जाणवू लागला  आहे. हात-पाय दुखणे, घसा खवखवणे, डोकेदुखी,  ताप, सर्दी, खोकला या प्रकारची लक्षणे नागरिकांमध्ये  दिसून येत आहेत. सर्वाेपचार रुग्णालयासह शहरा तील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली  आहे. ही लक्षणे सामान्य वाटत असली, तरी डेंग्यू,  डायरियासह स्वाइन फ्लूचीदेखील प्राथमिक लक्षणे  आहेत. त्यामुळे कुठल्याही दुखण्याला साधारण  समजून न टाळता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे  घ्या, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात  आले आहे. 

‘प्लेटलेट’ कमी होण्यार्‍या रुग्णांची संख्या मोठीपावसाळय़ात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने कीटकजन्य  आजारांचे प्रमाण वाढीस लागले आहे. डेंग्यूसदृश  आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली  आहे. आजारी पडलेल्या रुग्णांच्या रक्त नमुन्यांची त पासणी केली असता, प्लेटलेट कमी झाल्याचे  आढळून येतात; मात्र डेंग्यूचा अहवाल ‘निगेटिव्ह’  येत असल्याने डॉक्टरही संभ्रमात पडले आहेत. 

‘स्वाइन फ्लू’ची धास्ती कायमडेंग्यू, हिवताप यासारख्या आजारांचे रुग्ण वाढत  असतानाच शहरासह संपूर्ण जिल्हय़ात स्वाइन फ्लू या  घातक आजाराची धास्ती कायम आहे. या संसर्गजन्य  आजारामुळे ग्रस्त असलेल्या नऊ पॉझिटिव्ह रुग्णांवर  शहरातील मल्टिस्पेशालिटी इस्पितळ व सवरेपचार  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्हय़ात आता पर्यंत स्वाइन फ्लूने २0 जणांचा बळी घेतला आहे.

 सध्या वातावरणात झपाट्याने बदल होत आहेत,  तसेच डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे  ‘व्हायरल फिव्हर’चे रुग्ण वाढले आहेत. ताप,  सर्दी-खोकला आदी लक्षणे आढळून आल्यास त्वरित  दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत. - डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक,  अकोला.