शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

दीक्षांत समारोहासाठी माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याच्या परंपरेचा भंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 13:17 IST

माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याच्या परंपरेचा भंग असल्याचा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केला.

अकोला: राजकारणाला बळी न पडता कृषी विद्यापीठाची एक इंच जमीन व मालमत्तेला हात लावू दिला नाही. खरेदी हस्तक्षेप रोखला. खुर्चीच्या प्रेमात कधीच पडलो नाही. कृषी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी काम केले. असे असताना दीक्षांत समारंभाला गत दोन वर्षांपासून मला आमंत्रित केले जात नाही, हा माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याच्या परंपरेचा भंग असल्याचा आरोप डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांनी केला.ह्युस्टन टेक्सास येथून ई-मेलद्वारे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विद्यमान कुलगुरू ंना पाठविलेल्या पत्राची प्रती लोकमतलादेखील पाठविली. या पत्रामध्ये डॉ. दाणी यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणतात, दोन वर्षांपूर्वी मी निवृत्त झालो. त्या वेळपासून या कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून दीक्षांत समारंभाला मला बोलावले जात नाही. माजी कुलगुरूंना आमंत्रित करण्याची परंपरा तोडण्याचा अधिकार विद्यमान कुलगुरू कडे आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विद्यमान कुलगुरूं च्या जबाबदारीची आठवण करू न देत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी याच कृषी विद्यापीठाचा विद्यार्थी असून, माझे वडीलही याच विद्यापीठात कार्यरत होते. माझे शिक्षकही अस्तित्वात आहेत. माझ्या कुलगुरू पदाच्या कार्यकाळात कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी समितीच्या परवानगीशिवाय विद्यापीठाची जमीन व मालमत्ता ताब्यात देणार नाही, असा साहसी निर्णय घेतला. विद्यापीठाचे विभाजन नेहमीच नाकारले. कार्यकारी आणि शैक्षणिक परिषदेचा अध्यक्ष म्हणून अधिकार आणि पावित्र्य, कर्तव्य शेवटपर्यंत काळजीपूवक, निडरपणे पूर्ण केले. नागपूर येथील मोठे प्रेक्षकगृह नष्ट करण्याचा प्रयत्न झाला. या विरोधात निर्णय घेत सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू न प्रेक्षकगृह पुन्हा विद्यापीठाला मिळवून दिले. या अगोदर ते शक्य झाले नाही. खरेदी कार्यात हस्तक्षेप करण्याची परवानगी दिली नाही. कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया पारदर्शी, राजकीय हस्तक्षेपमुक्त ठेवली. विद्यापीठाला राजकीय रणांगण होऊ दिले नाही; पण आपण माझ्या सेवानिवृत्तीपासून अपमानास्पद वागणूक दिली आहे. हे कोणाच्या ऐकण्यावरू न तर आपण करीत नाहीत ना, असेही त्यांनी म्हटले आहे.कुलगुरू पदी माझी नियुक्ती रद्द केली गेली. ती वैयक्तिक वैध कारणे नव्हती? सर्वोच्च न्यायालयांनी असामान्य वैयक्तिक गुणवत्ता आणि अखंडतेचे प्रमाणपत्र मला दिले आहे. गुणवत्तेवर मी कुलगुरू झालो. खुर्चीच्या प्रेमात पडलो नाही. शेवटपर्यंत लढलो. माझा कार्यकाळ संपण्याला १४ दिवस बाकी असताना, मला राज्यपालांनी नियुक्त केले; पण नागरिकत्वाच्या अवास्तिक प्रश्नावर प्रशासकीय अनियमितता या कारणास्तव माझी मूळ नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यामध्ये माझा दोष काय, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या पत्राच्या उत्तराच्या प्रतीक्षेत असल्याचेही त्यांनी कुलगुरू ंना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ