शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांच्या गावांत थांबले कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी  वाचन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:50 IST

अकोला : ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी वाचन करण्यात येऊ   नये, असे राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. त्यानुषंगाने  जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी भरलेल्या अर्जांंचे चावडी वाचन  थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्या तील उपविभागीय अधिकारी (एसडीओ )आणि तहसीलदारांना  बुधवारी देण्यात आल्या.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या एसडीओ-तहसीलदारांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी वाचन करण्यात येऊ   नये, असे राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. त्यानुषंगाने  जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी भरलेल्या अर्जांंचे चावडी वाचन  थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्या तील उपविभागीय अधिकारी (एसडीओ )आणि तहसीलदारांना  बुधवारी देण्यात आल्या.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंंत राज्यातील थकबाकीदार शे तकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड  लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची  नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंंत  प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन  अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेत स्थळावर भरण्यात  आले.  जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र  (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत  २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंंंत  जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे  ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी  ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे चावडी वाचन जिल्हय़ातील  गावागावांत २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले होते. त्यानुसार  चावडी वाचनाला २७ सप्टेंबर रोजी सुरुवातदेखील करण्यात  आली. दरम्यान, ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या  ठिकाणी कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन करण्यात येऊ  नये, अशा सूचनांचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत २७ स प्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार  ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे  चावडी वाचन थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि  तहसीलदारांना देण्यात आल्या. त्यामुळे ग्राम पंचायतींच्या  निवडणुका असलेल्या गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंंचे चावडी  वाचन थांबले आहे.

३१९ ग्रामपंचायत स्तरावर झाले चावडी वाचन!कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील शेतकरी  याद्यांच्या  चावडी वाचनास २७ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सुरुवात  करण्यात आली. पहिल्या दिवशी ३१९ ग्रामपंचायत स्तरावर  चावडी वाचन करण्यात आले. त्यामध्ये अकोला-४५, अकोट  -४५,तेल्हारा-६९,बाश्रीटाकळी-४५, बाळापूर -३0, पातूर -२१  व मूर्तिजापूर तालुक्यात -६४ ग्राम पंचायत स्तरावर अर्जांंंच्या  माहितीचे चावडी वाचन करण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या मार्गदर्शन  पत्रानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्यांचे चावडी वाचन करण्यात येऊ नये, अशा  सूचना जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी-तहसीलदारांना  देण्यात आल्या आहेत.- राजेश खवलेप्रभारी अपर जिल्हाधिकारी