शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

निवडणुकांच्या गावांत थांबले कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी  वाचन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:50 IST

अकोला : ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी वाचन करण्यात येऊ   नये, असे राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. त्यानुषंगाने  जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी भरलेल्या अर्जांंचे चावडी वाचन  थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्या तील उपविभागीय अधिकारी (एसडीओ )आणि तहसीलदारांना  बुधवारी देण्यात आल्या.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाच्या एसडीओ-तहसीलदारांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंचे चावडी वाचन करण्यात येऊ   नये, असे राज्य निवडणूक आयोगाचे पत्र प्राप्त झाले. त्यानुषंगाने  जिल्ह्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी भरलेल्या अर्जांंचे चावडी वाचन  थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्या तील उपविभागीय अधिकारी (एसडीओ )आणि तहसीलदारांना  बुधवारी देण्यात आल्या.सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंंत राज्यातील थकबाकीदार शे तकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड  लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची  नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंंत  प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन  अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेत स्थळावर भरण्यात  आले.  जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र  (सीएससी) व आपले सरकार सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत  २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंंत थकबाकीदार शेतकर्‍यांचे  कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. मुदतीपर्यंंंत  जिल्हय़ात १ लाख ३८ हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे  ऑनलाइन अर्ज भरण्यात आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी  ऑनलाइन भरलेल्या अर्जाचे चावडी वाचन जिल्हय़ातील  गावागावांत २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्याचे नियोजन  जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले होते. त्यानुसार  चावडी वाचनाला २७ सप्टेंबर रोजी सुरुवातदेखील करण्यात  आली. दरम्यान, ग्राम पंचायतींच्या निवडणुका असलेल्या  ठिकाणी कर्जमाफीच्या अर्जांचे चावडी वाचन करण्यात येऊ  नये, अशा सूचनांचे पत्र राज्य निवडणूक आयोगामार्फत २७ स प्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार  ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या गावांमध्ये  कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे  चावडी वाचन थांबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी  कार्यालयामार्फत जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी आणि  तहसीलदारांना देण्यात आल्या. त्यामुळे ग्राम पंचायतींच्या  निवडणुका असलेल्या गावांमध्ये कर्जमाफीच्या अर्जांंंचे चावडी  वाचन थांबले आहे.

३१९ ग्रामपंचायत स्तरावर झाले चावडी वाचन!कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील शेतकरी  याद्यांच्या  चावडी वाचनास २७ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सुरुवात  करण्यात आली. पहिल्या दिवशी ३१९ ग्रामपंचायत स्तरावर  चावडी वाचन करण्यात आले. त्यामध्ये अकोला-४५, अकोट  -४५,तेल्हारा-६९,बाश्रीटाकळी-४५, बाळापूर -३0, पातूर -२१  व मूर्तिजापूर तालुक्यात -६४ ग्राम पंचायत स्तरावर अर्जांंंच्या  माहितीचे चावडी वाचन करण्यात आले.

राज्य निवडणूक आयोगामार्फत प्राप्त झालेल्या मार्गदर्शन  पत्रानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका असलेल्या  गावांमध्ये कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्यांचे चावडी वाचन करण्यात येऊ नये, अशा  सूचना जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी-तहसीलदारांना  देण्यात आल्या आहेत.- राजेश खवलेप्रभारी अपर जिल्हाधिकारी