शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

अकोला जिल्ह्यातील ५१० गावांत ग्रामस्थांना मिळत नाही ५५ लीटर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 10:49 IST

Akola News ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सात प्रादेशिक, ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा.ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबास २०२४ पर्यंत नळजोडणीव्दारे दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात सद्यस्थितीत सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत व ग्रामपंचायतींच्या ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

किती दिवसाआड मिळते पाणी

अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

अकोला तालुक्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत १० ते १२ दिवसाआड.

खांबोरा ४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत २ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील लोहारा २ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दररोज.

बाळापूर तालुक्यातील वझेगाव २ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत दररोज.

मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ११ गावांना ........ दिवसाआड.

 

एकाही गावात नाही पाणीटंचाई!

यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरींमध्ये लक्षणीय जलसाठा उपलब्ध असून, नदी व नाले वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचई नाही.

 

६९९ गावांसाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले!

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यासाठी २२७ याेजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. ५१० गावांत दरडोई प्रतिदिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.

 ए.ए. खान उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक