शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अकोला जिल्ह्यातील ५१० गावांत ग्रामस्थांना मिळत नाही ५५ लीटर पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 10:49 IST

Akola News ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सात प्रादेशिक, ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा.ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागात सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असला तरी, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे.

शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबास २०२४ पर्यंत नळजोडणीव्दारे दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यात सद्यस्थितीत सात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत व ग्रामपंचायतींच्या ४९६ स्वतंत्र पाणी पुरवठा योजनांव्दारे पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी पुरवठा करण्यात येत असून, जिल्ह्यातील ५१० गावांतील ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे.

किती दिवसाआड मिळते पाणी

अकोट येथील ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

अकोला तालुक्यातील खांबोरा ६० खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत १० ते १२ दिवसाआड.

खांबोरा ४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ३ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील कारंजा रमजानपूर १० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत २ दिवसाआड.

बाळापूर तालुक्यातील लोहारा २ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत दररोज.

बाळापूर तालुक्यातील वझेगाव २ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत दररोज.

मूर्तिजापूर तालुक्यातील लंघापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत ११ गावांना ........ दिवसाआड.

 

एकाही गावात नाही पाणीटंचाई!

यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने, जिल्ह्यातील धरणे, तलाव, विहिरींमध्ये लक्षणीय जलसाठा उपलब्ध असून, नदी व नाले वाहत असल्याच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत जिल्ह्यातील एकाही गावात पाणीटंचई नाही.

 

६९९ गावांसाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविले!

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये ग्रामस्थांना दरडोई प्रती दिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यासाठी २२७ याेजनांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

 

जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांतर्गत २०६ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करण्यात येत आहे. ५१० गावांत दरडोई प्रतिदिवस ४० लीटर किंवा त्यापेक्षा कमी पाणी मिळत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ६९९ गावांत दरडाेई प्रतिदिवस ५५ लीटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी २२७ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले.

 ए.ए. खान उपकार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद.

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक