अकोला : विदर्भातील संत्रा पिकाला बदलत्या हवामानाची झळ बसली असून, यंदा संत्र्याला बहर गळती सुरू झाली आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. यापृष्ठभूमिवर संत्रा उत्पादक शेतकर्यांनी शासनाला निवेदन देऊन संत्रा उत्पादकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.राज्यात सर्वाधिक १ लाख ५0 हेक्टर संत्रा फळ पिकाचे क्षेत्र विदर्भात आहे; परंतु सतत बदलत असलेल्या हवामानामुळे, संत्रा फळे व क्षेत्र वाढीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यावर्षीही तेच चित्र असून, जवळपास महिनाभर पाऊसच नसल्याने तापमान प्रचंड वाढले होते. त्यामुळे संत्र्यांच्या पीकावर परिणाम झाला आहे.डिंक्या या रोगाचा सामना करणार्या संत्र्यावर (कोलॅकोट्रायकम) मूळकूजसारखा बुरशीजन्य रोगाचाही प्रादुर्भाव वाढत असल्याने बहर गळतीत वाढ झालेली आहे. दरम्यान माजी कुलगुरू डॉ. शरदराव निंबाळकर यांनी सुरुवातीला पाऊस नसल्याने भूजल पातळी घसरली होती आणि तापमानात वाढ झाल्याने संत्रा या फळ पिकाचा बहर गळण्यास सुरुवात झाली असल्याचे सांगीतले. तसेच विविध बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले. ** २00५ सालीही संत्र्यावर आघात सन २00५ मध्ये पाऊस नव्हता, परिणामी शेतकर्यांवर संत्रा झाडे तोडण्याची पाळी आली होती. त्यावर्षी जवळपास ४0 ते ५0 हजार हेक्टरवरील संत्र्यांची झाडे तोडण्यात आली होती.
विदर्भातील संत्रा बहराला गळती सुरूच!
By admin | Updated: September 10, 2014 01:19 IST