शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रब्बी हंगामात विदर्भात तेलबिया पिकांवर भर!

By admin | Updated: October 7, 2014 01:51 IST

अवर्षणग्रस्त भागासाठी डॉ.पंदेकृविने केली करडीची शिफारस.

अकोला : विदर्भात तेलबिया पिकांचे क्षेत्र घटले असून, या क्षेत्रात वाढ होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी या विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणार्‍या वाणांची निर्मिती केली आहे. यावर्षी पाऊस अल्प प्रमाणात झाल्याने अवर्षण स्थितीमध्ये येणार्‍या विविध तेलवाणांसह करडी पिकाची शिफारस विद्यापिठाने केली आहे. या रब्बी हंगामात तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर कृषी विभाग व कृषी शास्त्रज्ञांनी भर दिला आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पीकेव्ही पीक आणि करडी फिल्ड व्हयू हे तेलबिया पीक रब्बी हंगामात येणारे असून, अवर्षणप्रवण क्षेत्रासाठी हे एक चांगले पीक आहे. राज्यात या पिकाची पेरणी २.७ लाख हेक्टर क्षेत्रावर केली जात असून, यापासून १.६८ लाख मेट्रिक टन उत्पादन होत असल्याचा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे. या पिकाची राज्यातील सरासरी उत्पादकता ६0६ किलो एवढी आहे. या पिकाची मुळं जमिनीत खोलवर जात असल्यामुळे, पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता या पिकात आहे. दरम्यान, भुईमूग, तीळ, जवस, सूर्यफूल, करडी, करडा आणि सोयाबीन आदी पिकांना राज्यातील वातावरण पोषक असल्याने तीन वर्षांपूर्वीपर्यंत राज्यात जवळपास ४0 लाख हेक्टर क्षेत्रावर या विविध तेलबिया पिकांचे उत्पादन घेतले जात होते; परंतु अचानक या क्षेत्रात घट झाली. राज्यात सोयाबीनचे क्षेत्र वाढल्याने तेलबिया पिकांची उणीव भरू न काढण्याचा प्रयत्न झाला असला तरी, खाद्यतेलाची गरज असलेल्या भुईमूग व इतर वाणांच्या क्षेत्रामध्ये लक्षणीय घट झाली आहे. तीन वर्षांपूर्वी राज्यात ७ लाख हेक्टर असलेले भुईमुगाचे क्षेत्र घसरू न दोन ते अडिच लाख हेक्टरच्या खाली आले आहे. सूर्यफुलाचे क्षेत्र २ लाख ६९ हेक्टर होते, तेही १ लाख हेक्टरवर आले आहे. करडीचे क्षेत्र दोन लाख हेक्टर होते, ते कमी झाले आहे. याचा परिणाम खाद्यतेलाच्या वाढणार्‍या किंमतींवर दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.या पृष्ठभूमीवर शासनाचा कृषी विभाग आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या रब्बी हंगामात तेलबिया क्षेत्र वाढीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी कृषी विद्यापीठाने भरघोस उत्पादन देणारी विविध तेलबिया वाण विकसित केली असून, या वाणांसह करडी या तेलबिया वाणांचा प्रसार करण्यावरही भर दिला जात आहे.