शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

विकास हवा असेल तर विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक - आमदार आशीष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 01:54 IST

अकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे प्रश्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देआत्मबळ यात्रेत अकोटमध्ये आमदार आशीष देशमुख यांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : विदर्भाची सद्यस्थिती, सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांचे प्रश्न, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, वीज भारनियमन, कुपोषण, नक्षलवाद आदी समस्या दूर करून विदर्भाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले.काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांची आत्मबळ यात्रा १६ जानेवारी रोजी अकोट शहरात पोहोचली. स्थानिक राजमंगल सभागृहात आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी उपस्थितांशी व पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, की राज्यातील भाजप नेतृत्वातील सरकार सत्तेवर येऊन तीन वर्षे उलटली, तरी वर्‍हाड प्रांतातील अनेक कामे रखडलेली आहेत. फक्त अकोला जिल्ह्याचा विचार केला, तर शेतकरी कशीबशी शेती करीत आहेत. त्यांच्या पाठीशी सरकार उभे असल्याचे दिसत नाही. खारपाणपट्टय़ाचा प्रश्न तसाच आहे. अकोला जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. जिल्हा कापूस उत्पादक असला, तरी जिल्ह्यातील दोन्ही सूतगिरण्या बंद आहेत. जिल्हय़ात प्रक्रिया उद्योग नाहीत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती होणे आवश्यक असल्याचे सांगून विदर्भ राज्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित येऊन विदर्भ आत्मबळ यात्रा यशस्वी करावी, असे आवाहन आमदार डॉ. देशमुख यांनी केले. अकोट येथील सभेनंतर ही यात्रा मुंडगाव येथे पोहोचली. येथेसुद्धा आमदार डॉ. देशमुख यांनी जनतेशी संवाद साधला.

वेगळ्या विदर्भाची मागणी करताच पक्षाची नोटीस भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्याचा ठराव घेतला होता. अशासकीय ठराव यापूर्वी अनेक वेळा मांडण्यात आलेत; मात्र अद्याप हालचाली नाहीत. त्यामुळे विदर्भ राज्याचा मुद्दा उपस्थित केल्याने पक्षाची नोटीस मिळाल्याची खंत यावेळी डॉ. देशमुख यांनी बोलून दाखविली. नोटीसचे उत्तर हे जनतेशी चर्चा करूनच देणार असल्याचे ते म्हणाले. 

टॅग्स :akotअकोट