शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

जटिल समस्यांवर वेगळा विदर्भ हाच पर्याय !

By admin | Updated: September 12, 2016 02:08 IST

शेगाव येथील व-हाड परिषदेत विदर्भवाद्यांचा निर्धार.

शेगाव (जि. बुलडाणा), दि. ११: शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीवर केवळ वेगळा विदर्भ हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट करुन वेगळा विदर्भ निर्माण करण्याचा निर्धार वर्‍हाड परिषदेत विदर्भवाद्यांनी रविवारी येथे व्यक्त केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शेगाव येथील वर्धमान मंगल कार्यालयात रविवारी वर्‍हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव चटप होते तर उद्घाटक म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते. यावेळी मत व्यक्त करताना डॉ. खांदीवाले म्हणाले, की विदर्भात शेतकरी मोठय़ा संख्येने त्यामुळे विदर्भ वेगळा झाल्यावर शेतकर्‍यांचा विकास करायला हवा. पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस, द्राक्षवाल्या शेतकर्‍यांसाठी सरकार काम करते, त्यामुे ऊस व द्राक्ष उत्पादक शेतकरी कधीच आत्महत्या करीत नाहीत. कापूस उत्पादक शेतकर्‍याशी सरकारला काहीच घेणे देणे नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्पांचे काम पुर्ण झाले मात्र, विदर्भातील प्रकल्पांचे काम अजूनही अर्धवट आहे. हा विदर्भावर अन्यायच असून, त्यामुळे विदर्भ वेगळा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.विदर्भातील तरूणांना २३ टक्के नोकर्‍या देण्याचे महाराष्ट्रात सामील होताना करार करताना आश्‍वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ८ टक्केच नोकर्‍या देण्यात आल्या. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्यायच होत आला आहे. विदर्भात वीज तयार होते, मात्र ती वीज पश्‍चिम महाराष्ट्राला दिली जाते. वीज निर्माण करणारा विदर्भ अंधारात राहतो. सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी विदर्भातील जनतेला ग्रासले आहे. आम्हाला या समस्या सोडवून पाहिजे नाही तर विदर्भ वेगळा पाहिजे आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला अमरावती विभागातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, प्रवीणकुमार चक्रवर्ती, अँड. नंदाताई पराते, रमेश गजबे आदी उपस्थित होते.