शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

जटिल समस्यांवर वेगळा विदर्भ हाच पर्याय !

By admin | Updated: September 12, 2016 02:08 IST

शेगाव येथील व-हाड परिषदेत विदर्भवाद्यांचा निर्धार.

शेगाव (जि. बुलडाणा), दि. ११: शेतकरी आत्महत्या व बेरोजगारीवर केवळ वेगळा विदर्भ हा एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट करुन वेगळा विदर्भ निर्माण करण्याचा निर्धार वर्‍हाड परिषदेत विदर्भवाद्यांनी रविवारी येथे व्यक्त केला. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने शेगाव येथील वर्धमान मंगल कार्यालयात रविवारी वर्‍हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार वामनराव चटप होते तर उद्घाटक म्हणून अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले उपस्थित होते. यावेळी मत व्यक्त करताना डॉ. खांदीवाले म्हणाले, की विदर्भात शेतकरी मोठय़ा संख्येने त्यामुळे विदर्भ वेगळा झाल्यावर शेतकर्‍यांचा विकास करायला हवा. पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस, द्राक्षवाल्या शेतकर्‍यांसाठी सरकार काम करते, त्यामुे ऊस व द्राक्ष उत्पादक शेतकरी कधीच आत्महत्या करीत नाहीत. कापूस उत्पादक शेतकर्‍याशी सरकारला काहीच घेणे देणे नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रकल्पांचे काम पुर्ण झाले मात्र, विदर्भातील प्रकल्पांचे काम अजूनही अर्धवट आहे. हा विदर्भावर अन्यायच असून, त्यामुळे विदर्भ वेगळा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.विदर्भातील तरूणांना २३ टक्के नोकर्‍या देण्याचे महाराष्ट्रात सामील होताना करार करताना आश्‍वासन देण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र ८ टक्केच नोकर्‍या देण्यात आल्या. त्यामुळे विदर्भावर सातत्याने अन्यायच होत आला आहे. विदर्भात वीज तयार होते, मात्र ती वीज पश्‍चिम महाराष्ट्राला दिली जाते. वीज निर्माण करणारा विदर्भ अंधारात राहतो. सिंचनाचा अनुशेष, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, बेरोजगारी अशा अनेक समस्यांनी विदर्भातील जनतेला ग्रासले आहे. आम्हाला या समस्या सोडवून पाहिजे नाही तर विदर्भ वेगळा पाहिजे आहे, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला अमरावती विभागातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले, प्रवीणकुमार चक्रवर्ती, अँड. नंदाताई पराते, रमेश गजबे आदी उपस्थित होते.