शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
2
आशिष शेलार मुंबई, शिरीष बोराळकर छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष; भाजपाकडून ८१ जिल्हाध्यक्षांची यादी जाहीर
3
मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
4
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
5
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
7
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
8
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
9
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
10
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
11
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
12
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
13
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
14
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
15
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
16
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
17
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
18
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?
19
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
20
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती

विदर्भातील शेतकऱ्यांचा ‘बीबीएफ’ तंत्राकडे कल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 10:59 IST

Vidarbha farmers turn to 'BBF' technique : पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) पद्धत फायदेशीर ठरत आहे.

- सागर कुटे

अकोला : पावसाचा दीर्घकालीन खंड, अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी, यामुळे पिकांची वाढ व उत्पादनावर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट येते. अशावेळी पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, पिकांच्या उत्पादन वाढीसाठी रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) पद्धत फायदेशीर ठरत आहे. विदर्भात या तंत्राव्दारे हजारो शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड केली आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांची प्रयोगशीलतेकडे वाटचाल सुरू आहे.

अनेकानेक वर्षांपासून विदर्भातीलशेतकरी पारंपरिक पीक पद्धतीनेच सोयाबीनची पेरणी करीत आहे. या पद्धतीत लागवड खर्च वाढत असून उत्पन्न मात्र कमी होत आहे. यातच अवेळी पाऊस, तापमानात बदल यामुळे पिकांवर परिणाम होत आहे. अशावेळी पडणाऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अलीकडे रुंद वरंबा सरी लागवड (बीबीएफ) प्रचलित होत आहे. गत दोन-तीन वर्षांपासून विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात या पद्धतीने पेरणी करण्यात वाढ झाली आहे. जास्तीत जास्त शेतकरी बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी करीत आहे. या पद्धतीमुळे चांगले उत्पादनही हाती लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

विभागात सोयाबीन क्षेत्र

१४,९९,५९० हेक्टर

पेरणी झालेले क्षेत्र

१४,५०,००५

 

तंत्राचे फायदे

या पद्धतीत सोयाबीनच्या ३ अथवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे कमी पावसाच्या काळात, मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या काळात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

बीबीएफ तंत्राव्दारे पेरणी केल्यास २० टक्के उत्पन्नात वाढ, ८ किलो प्रती एकर बियाण्यांची बचत होते. चार दात्यांचे यंत्र पेरणीच्या दृष्टीने अतिशय चांगले व योग्य आहे. गादी वाफ्याचा योग्य परिणाम साधावयाचा असेल व जमिनीत पाणी जिरवायचे असेल तर हे तंत्र योग्य आहे. शिवाय अधिकचे पाणी सरीद्वारे निघूनही जाते.

- डॉ. शैलेश ठाकरे, विभाग प्रमुख, कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंदेकृवि, अकोला

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीVidarbhaविदर्भ