शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

कर्जमाफीच्या अर्जांची   उद्यापासून पडताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 01:41 IST

अकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील  शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांंची २७ स प्टेंबरपासून पडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील  गावागावांत होणार्‍या चावडी वाचनात कर्जमाफीचे अर्ज  भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे

ठळक मुद्देगावागावांत चावडी वाचनात होणार शेतकरी याद्यांचे वाचन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत जिल्हय़ातील  शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या कर्जमाफीच्या अर्जांंची २७ स प्टेंबरपासून पडताळणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील  गावागावांत होणार्‍या चावडी वाचनात कर्जमाफीचे अर्ज  भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात येणार आहे.  सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत राज्यातील थकबाकीदार  शेतकर्‍यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  त्यानुसार कर्जमाफी योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकर्‍यांना दीड  लाख रुपयांपर्यंंत कर्जमाफी देण्यात येणार असून, कर्जाची  नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंंत  प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या  शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.  त्यानुषंगाने थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ‘ऑनलाइन’  अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरण्यात  आले. कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत २२ सप्टेंबर  रोजी रात्री १२ वाजेपर्यंंत होती. त्यानुसार जिल्हय़ातील महा ई- सेवा केंद्र, सामूहिक सेवा केंद्र (सीएससी) व आपले सरकार  सेवा केंद्र इत्यादी सेतू केंद्रांवर गत २४ जुलै ते २२ सप्टेंबरपर्यंंत  थकबाकीदार शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात  आले. मुदतीपर्यंंत जिल्हय़ात २ लाख ४८ हजार ४२९ शे तकर्‍यांच्या अर्जांंची नोंदणी करण्यात आली असून, १ लाख ३८  हजार ९६२ शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यात  आले. कर्जमाफीसाठी शेतकर्‍यांनी ऑनलाइन भरलेल्या अर्जांंची  गावनिहाय पडताळणी २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात येणार  आहे. त्यामध्ये गावागावांत ग्रामपंचायतींमध्ये कर्जमाफीसाठी  अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्यात करण्यात  येणार आहे.

 तलाठी -ग्रामसेवकांच्या नेमणुका; आज प्रशिक्षणचावडी वाचनात कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या  थकबाकीदार शेतकर्‍यांच्या याद्यांचे वाचन करण्याकरिता   जिल्हय़ात गावनिहाय तलाठी व ग्रामसेवकांच्या नेमणुका  करण्यात आल्या आहेत. कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या शे तकर्‍यांच्या याद्यांसंदर्भात शेतकर्‍यांकडून दाखल होणारे आक्षे पही चावडी वाचनात निकाली काढण्यात येणार  आहेत.  त्यासाठी तलाठी-ग्रामसेवकांचे तालुकानिहाय प्रशिक्षण २६ स प्टेंबर रोजी घेण्याच्या सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या  आहेत, अशी माहिती प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले  यांनी दिली.

अर्जांंची अशी होणार पडताळणी !गावनिहाय चावडी वाचनात कर्जमाफीसाठी पात्र व अपात्र  ठरणारे शेतकरी, कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेले शे तकरी, ऑनलाइन अर्ज भरलेल्या शेतकर्‍यांपैकी पुराव्याकरिता  अर्ज प्रलंबित असणारे शेतकरी इत्यादी प्रकारची माहिती चावडी  वाचनात अर्जांंच्या पडताळणीत देण्यात येणार आहे. त्यामध्ये  कर्जमाफीसाठी अपात्र दर्शविण्यात आलेले शेतकरी  कर्जमाफीसाठी पात्र असल्याचा पुरावा सादर करू शकतील.