शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल ११ सप्टेंबरला;दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:45 IST

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देकिशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले.

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी २१ साक्षीदार तपासले असून, त्यामधील दोन साक्ष महत्त्वाच्या असल्याचे सांगण्यात आले.खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल व राजू मेहेर व निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात तपास केल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात आरोपींविरुद्ध हत्या करणे, पुरावे नष्ट करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले; मात्र आरोपींनी हत्या केली नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर साक्ष-पुरावे न्यायालयात झाले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने मिर्झा व दिलदार खान यांनी युक्तिवाद केला. त्याला अ‍ॅड. निकम यांनी उत्तरे दिली असून, मंगळवारी या हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी तर आरोपींच्यातीने अ‍ॅड. वसीम मिर्झा, अ‍ॅड. दिलदार खान व अ‍ॅड. हातेकर यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय