शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
3
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
4
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
5
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
6
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
7
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
8
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
9
भाजपचे माजी नगरसेवक हरेश केणी यांचा कॉग्रेस मध्ये प्रवेश
10
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
11
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
12
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
13
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
14
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
15
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
16
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
17
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल ११ सप्टेंबरला;दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:45 IST

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देकिशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले.

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी २१ साक्षीदार तपासले असून, त्यामधील दोन साक्ष महत्त्वाच्या असल्याचे सांगण्यात आले.खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल व राजू मेहेर व निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात तपास केल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात आरोपींविरुद्ध हत्या करणे, पुरावे नष्ट करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले; मात्र आरोपींनी हत्या केली नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर साक्ष-पुरावे न्यायालयात झाले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने मिर्झा व दिलदार खान यांनी युक्तिवाद केला. त्याला अ‍ॅड. निकम यांनी उत्तरे दिली असून, मंगळवारी या हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी तर आरोपींच्यातीने अ‍ॅड. वसीम मिर्झा, अ‍ॅड. दिलदार खान व अ‍ॅड. हातेकर यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय