शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

किशोर खत्री हत्याकांडाचा निकाल ११ सप्टेंबरला;दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 14:45 IST

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

ठळक मुद्देकिशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले.

अकोला: शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात मंगळवारी पूर्ण झाली. या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी २१ साक्षीदार तपासले असून, त्यामधील दोन साक्ष महत्त्वाच्या असल्याचे सांगण्यात आले.खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल व राजू मेहेर व निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनात तपास केल्यानंतर दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर न्यायालयात आरोपींविरुद्ध हत्या करणे, पुरावे नष्ट करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले; मात्र आरोपींनी हत्या केली नसल्याचे न्यायालयासमोर सांगितले. त्यानंतर साक्ष-पुरावे न्यायालयात झाले. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद सुरू असतानाच सरकार पक्षातर्फे तब्बल २१ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने मिर्झा व दिलदार खान यांनी युक्तिवाद केला. त्याला अ‍ॅड. निकम यांनी उत्तरे दिली असून, मंगळवारी या हत्याकांडाची सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांनी या हत्याकांडाचा अंतिम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी तर आरोपींच्यातीने अ‍ॅड. वसीम मिर्झा, अ‍ॅड. दिलदार खान व अ‍ॅड. हातेकर यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय