शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

वसारीवासीयांनी गाव काढले विक्रीला!

By admin | Updated: April 4, 2016 02:12 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; लोकप्रतिनिधींवर रोष, दुष्काळामुळे ग्रामस्थ हतबल.

शिरपूर जैन (जि. वाशिम): सततच्या दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशातच शासनाकडून मदतही मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. या परिस्थितीला कंटाळून जामदरा गावाने खरीप हंगामावरच बहिष्कार घातल्यानंतर, आता मालेगाव तालुक्यातील वसारी गाव ग्रामस्थांनी चक्क विक्रीला काढले आहे. येथील शेतकर्‍यांनी ३ एप्रिल रोजी दुपारी गावातील बसस्थानक चौकात गाव विक्रीला काढल्याचे फलक लावून ठिय्या दिला. वाशिम जिल्ह्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. चार, पाच वर्षांंपासून थअवर्षणामुळे अत्यल्प उत्पादन मिळत आहे. दरवर्षी नशिबी उपेक्षाच येत असल्यामुळे आता शेतकर्‍यांची परिस्थितीशी लढण्याची हिंमतच राहीलेली नाही. यातूनच आता खरीप हंगामावर बहिष्कार टाकणे, तसेच गाव विक्रीला काढणे, यासारखे निर्णय शेतकरी घेत आहेत. दुष्काळी परिस्थिती असताना शासनाने अपेक्षित मदत केली नसल्यामुळे वसारी येथील गावकर्‍यांनी रोष व्यक्त करीत, ह्यदुष्काळग्रस्तांना मदत द्या, नाही तर गाव विकत घ्याह्ण असे फलक लावून गाव विक्रीस काढले आहे. रविवारी गावातील बहुतांश नागरिकांनी हा फलक लावून आगळेवेगळे आंदोलन केले. गावातील बसस्थानक चौकात शेकडो गावकर्‍यांनी ठिय्या दिला. फलकावर ह्यआमचे आमदार, खासदार कोणी पाहिलेत का?ह्ण असा प्रश्न करीत, त्यांना शोधून देणार्‍यास दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांकडून दोन रुपये इनाम ठेवण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांच्या नेतृत्वात शिवाजी लादे, भगवान जाधव, शालिक जाधव यांच्या मार्गदर्शनात शेकडो गावकरी जमले होते. यावेळी शासन आणि लोकप्रतिनिधींबाबत रोष व्यक्त करून, ह्यदुष्काळी मदत द्या, नाही तर गाव विकत घ्याह्ण अशा घोषणाही देण्यात आल्या. खासदार, आमदार दाखवा; बक्षीस मिळवा! मालेगाव तालुक्यातील वसारी हे गाव अकोला लोकसभा मतदारसंघात येते. येथील खासदार संजय धोत्रे दहा वर्षांंपासून एकदाही गावात आले नाही, तसेच आमदार अमित झनकही लग्नप्रसंग सोडले, तर गावातील समस्या ऐकण्यासाठी आले नाहीत. त्यामुळे आमदार, खासदार दाखवा व दोन रुपये बक्षीस मिळवा, असे फलक गावकर्‍यांनी लावले. गावात दुष्काळ असून, अजून कोणतीच मदत मिळाली नाही. शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असून, गावाकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी फिरकूनही पाहत नाहीत. त्यामुळे मदत मिळण्यासाठी वसारीवासीयांनी गाव विक्रीला काढले आहे.